जम्मू-काश्मीर - ३ दहशदवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश

पांपोर भागामधील एका इमारतीमध्ये घुसलेल्या ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास भारतीय लष्कराला यश आले आहे. दहशतवादी आणि लष्करात २ दिवसांपासून ही चकमक सुरू होती.  

Updated: Feb 22, 2016, 11:49 PM IST
जम्मू-काश्मीर - ३ दहशदवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश title=

श्रीनगर : पांपोर भागामधील एका इमारतीमध्ये घुसलेल्या ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास भारतीय लष्कराला यश आले आहे. दहशतवादी आणि लष्करात २ दिवसांपासून ही चकमक सुरू होती.  

"इमारतीत घुसलेले दहशतवादी हे परकीय दहशतवादी होते. दहशतवादी घुसले त्यावेळी या इमारतीमध्ये अनेक नागरिक अडकले होते. तेव्हा या नागरिकांची सुरक्षित सुटका करणे हे आमचे मुख्य ध्येय होते. इमारतीमधून 120 नागरिकांची सुटका करण्यात आली असे लष्कर अधिकाऱ्यांनी सांगितले.

हल्ल्यामध्ये लष्करे तैयबा ही दहशतवादी संघटना सहभागी असल्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. या चकमकीत भारतीय लष्कराचे २ कॅप्टन पवन कुमार आणि तुषार महाजन आणि लान्स नायक ओम प्रकाश हे शहीद झाले.