लष्करप्रमुखांनी देशाला नागवं केलं- बाळासाहेब

देशाकडे पुरेशी शस्त्र नाहीत असं पत्र लिहून लष्करप्रमुखांनी देशाला नागवं केलं, अशा शब्दांत बाळासाहेबांनी या वादावर नाराजी व्यक्त केली.... लष्करप्रमुखांनी पत्र लिहिण्यापेक्षा पंतप्रधानांना भेटून हे सांगायला हवं होतं, असं मत त्यांनी मांडलं.

Updated: Mar 29, 2012, 05:34 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

दिल्लीत सुरु असलेला लष्करप्रमुख आणि सरकारमधला संघर्ष, अण्णा विरुद्ध संसद वाद या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आज आपली रोखठोक मतं मांडताना लष्करप्रमुखांना टार्गेट केलं.... देशाकडे पुरेशी शस्त्र नाहीत असं पत्र लिहून लष्करप्रमुखांनी देशाला नागवं केलं, अशा शब्दांत बाळासाहेबांनी या वादावर नाराजी व्यक्त केली.... लष्करप्रमुखांनी पत्र लिहिण्यापेक्षा पंतप्रधानांना भेटून हे सांगायला हवं होतं, असं मत त्यांनी मांडलं.

 

देशातील सध्याच्या महत्वाच्या घडामोडींवरील ही ठाकरी मतं बाळासाहेबांनी झी 24 तासकडे मांडलीत.... आपल्या नेहमीच्याच मिश्किल आणि ठाकरी भाषेत या विविध मुद्यांवर बाळासाहेबांनी भाष्य केलं....शिवसेना डायरीचं शिवसेनाप्रमुखांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी रोखठोक मत मांडली