मातोश्रीवर नेत्यांची महत्वाची बैठक, काय आहे कारण?

मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची महत्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी ही तातडीची बैठक बोलवली आहे. 

Updated: Jan 22, 2018, 02:28 PM IST
मातोश्रीवर नेत्यांची महत्वाची बैठक, काय आहे कारण? title=

मुंबई : मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची महत्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी ही तातडीची बैठक बोलवली आहे. 

बैठकीला कोण?

या बैठकीला शिवसेना नेते मनोहर जोशी, सुभाष देसाई, दिवाकर रावते संजय राऊत, अनिल परब, रामदास कदम, गजानन कीर्तिकर आणि अन्य नेते, पदाधिकारी उपस्थित आहे. 

नेत्यांमध्ये होणार फेरबदल

२३ जानेवारीला म्हणजे उद्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत संघटनात्मक निवडणुका आहेत. यावेळी काही फेरबदल होण्याची शक्यता आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलवली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच काही महत्वाचे ठरावही कार्यकारी बैठकीत मंजूर केले जाणार आहेत. त्याबाबत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.