राखी सावंतचे चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन कोहलीवर गंभीर आरोप

चॅम्पियंस ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतने विराट कोहलीवर टीका केली आहे.

Updated: Jul 11, 2017, 11:16 AM IST
राखी सावंतचे चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन कोहलीवर गंभीर आरोप title=

मुंबई : चॅम्पियंस ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतने विराट कोहलीवर टीका केली आहे.

राखी सावंतने म्हटलं आहे की, सामन्याआधी जोरदार पार्टी झाली होती आणि दारु प्यायले होते. दारू पिल्याने या सामन्यात खेळाडू जास्त रन नाही करु शकले. ज्यामुळे भारत हारला. राखीने विराटला म्हटलं की विराट दारु आणि सिगरेट जरा कमी कर. 

विराट कोहली आणि चॅम्पियंस ट्रॉफीवर बोलतांना राखी सावंतने म्हटलं की, विराटवर सर्व देशाचं प्रेम आहे. आम्हावा विश्वास होता की, भारत फायनल जिंकेल. पण याच्या उलट झालं.पाकिस्तानने आपल्याला 180 रनने हारवलं. टीम इंडिया सीरीजमधील सर्व सामने जिंकत आली होती. त्यामुळे त्यांना घमंड चढला. फायनलच्या आधल्या रात्री विराट आणि इतर खेळाडूंनी दारू पिली. त्यामुळे ते रन नाही करु शकले असा गंभीर आरोप राखी सावंतने केला आहे.