रक्षाबंधनाहून घरी परतताना अपघात, तीन ठार

Updated: Aug 27, 2018, 11:49 AM IST

पालघर : रक्षाबंधनच्यादिवशी पालघरमधील डहाणू चारोटी नाशिक रस्त्यावर एक भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. इथल्या सारणी गाव येथे भरधाव वेगाने येणाऱ्या दोन दुचाकींच्या अपघात झालायं. रात्रीच्या वेळेस हा अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झालेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लहान मुलं जखमी

मृतांमध्ये स्वप्निल शिंगडा आणि त्याची पत्नी शर्मिला शिंगडा आणि मनोज गुहे यांचा समावेश आहे. तर दोन लहान मुलं गंभीर जखमी झाली आहेत. हा अपघात रात्री झालाय. शिंगडा दाम्पत्य रक्षाबंधनावरून परतत असताना हा अपघात झाला.