नाणार प्रकल्पविरोधातील मुंबईतील आंदोलन मागे

रत्नागिरी जिल्ह्ल्यातल्या राजापूर येथील नाणार प्रकल्पाच्या मुद्यावर मुंबईतल्या आझाद मैदानावर सुरू केलेलं आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. 

Surendra Gangan Updated: Mar 14, 2018, 08:07 PM IST
नाणार प्रकल्पविरोधातील मुंबईतील आंदोलन मागे title=

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्ल्यातल्या राजापूर येथील नाणार प्रकल्पाच्या मुद्यावर मुंबईतल्या आझाद मैदानावर सुरू केलेलं आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. 

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नाणारवासियांच्या बैठकीत तोडगा काढण्यात आला. मुख्यमंत्री आणि नारायण राणेंच्या आश्वासनानंतर नाणारवासियांचं समाधान झालं. 

तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत नाणारवासियांची बैठक निष्फळ ठरली होती. मात्र राणेंनी मध्यस्थी करून पुन्हा बैठक घेतली. त्यात आश्वासनानंतर तोडगा काढण्यात यश आले आहे.