मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कट बांगलादेशींनी रचला

अटक केलेल्या पाच संशयित बांगलादेशींनी मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचल्याचं आता उघड झालंय.

Updated: Mar 21, 2018, 12:44 PM IST
मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कट बांगलादेशींनी रचला  title=

पुणे : अटक केलेल्या पाच संशयित बांगलादेशींनी मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचल्याचं आता उघड झालंय.

महाराष्ट्र एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अन्सारउल बांगला टीम म्हणजेच ए  बी टी या संघटनेनं महाराष्ट्रात तीन शहरात जाळं पसरवलं होतं. ही दहशतवादी संघटनेनं पुणे, महाड आणि अंबरनाथमध्ये पाळमुळं रोवली असल्याचं आता पुढे आलंय.  
अन्सार उल बांगला टीम अर्थात ABT या दहशतवादी संघटनेवर 2016 मध्ये बांगलादेशमध्ये बंदी घालण्यात आलीय. ही संघटना अल कायदाशी संलग्न असून कोलकाता, मुंबई आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा त्यांचा कट होता.

पण यापैकी कुठलीही योजना पूर्ण होण्याआधीच एटीएसनं पाच जणांना अटक करून कट उधळून लावला.