नाणार जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द, सुभाष देसाईंची घोषणा

उद्योग मंत्री सुभाष देसाईंची घोषणा

Updated: Apr 23, 2018, 01:23 PM IST
नाणार जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द, सुभाष देसाईंची घोषणा title=

नाणार : नाणारमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प होऊ देणार नाही. उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत ही घोषणा केली. तर दुसरीकडे जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करत असल्याची उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी घोषणा केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाणार दौ-यावर आहेत. तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत ते नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचंच लक्ष होतं. नाणारमध्ये होत असलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. भाजपप्रणीत सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेनं, प्रकल्पग्रस्तांच्या भूमिकेला आपला पाठिंबा दर्शवलाय. त्यामुळे नाणार प्रकल्पासंदर्भात उद्योग विभागानं काढलेला अध्यादेश रद्द करून, शिवसेनेनं आपली भूमिका कृतीतूनही स्पष्ट करावी अशी अपेक्षा नाणारवासियांची व्यक्त केली होती. 

मध्यतंरी उद्धव ठाकरे परदेशात असताना केंद्र सरकारनं शिवसेनेला अंधारात ठेऊन, सौदी अरेबियातल्या कंपनीबरोबर या प्रकल्पासाठी कराराला मंजुरी दिली. त्यामुळे चिडलेल्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली होती. त्याआधी हा प्रकल्प बळजबरीने राबवण्याचा प्रयत्न झाल्यास आपण मंत्रीपद सोडू अशी भूमिका शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशनात घेतली होती.

पाहा व्हिडिओ