बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

नवाब मलिक यांचे स्पष्टीकरण 

Updated: Jul 27, 2020, 09:42 PM IST
बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात नवाब मलिक यांची प्रतिक्रिया title=

मुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन काळात बकरी ईदमध्ये बोकडाच्या कुर्बानी संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. यावर राज्यमंत्री नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कुर्बानी वर बंदी नाही. गृहमंत्र्यांनी जी गाईडलाईन केलीय त्यात कोणतेही निर्बंध नसल्याचे मलिक म्हणाले लाँकडाऊन असताना बोकड कापताना कोणतीही बंदी नव्हती आताही बंदी नाही असे ते म्हणाले. 

बकरी ईद संदर्भात कोणतेही गैरसमज नाहीत. जे काही गैरसमज आहेत ते गृहमंत्री संबधीत अधिकाऱ्यांशी बोलून दूर करतील. मुंबई शहरात बकरी आणण्यासाठी कोणतीही वाहतूकीची अडचण नाही. 

ज्यांनी बकरी आँनलाईन नोंद केली असेल. त्यांनाही बकरी मिळेल. एकदा आँनलाईन बकरी बूक केली तर वाहतुकीशिवाय शिवाय त्यांची बकरी येवू शकत नाही. मुख्यमंत्र्यांकडे हे सर्व विषय ठेवण्यात आल्याचेही मलिक यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, बकरी ईद बाबत जे नियम आहेत ते तसेच आहेत.नियमानुसार बकरी ईद साजरी करता येईल. या संदर्भात कोणतीही अडचण नाही असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 

बकरी ईदसाठी कुठलीही सूट मिळणार नसल्याचं औरंगाबाद महापालिकेच्या आयुक्तांनी म्हटलं आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी ईदसाठी मशीद उघडणे आणि प्राण्यांची कुर्बानी देण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र कोरोनाची परिस्थिती पाहता  महापालिका हद्दीत सूट मिळणार नसल्याचं मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी म्हटलं आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ईद घरीच साजरी करण्यात यावी. सार्वजनिक ठिकाणी जमून सामूहिक नमाज अदा करण्यास बंदी असेल, असे आदेश महापालिकेचे आयुक्तांनी दिले आहेत. ईदच्या दिवशी मशिद किंवा इदगाह परिसरातही जमण्यास देखील मनाई करण्यात आले आहे.

सध्या जनावरांचे बाजारही बंद आहेत. त्यामुळे बकरी ईदसाठी नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने किंवा दूरध्वनीवरून जनावरे खरेदी करावी, असेही सूचित करण्यात आले आहे. नागरिकांनी प्रतिकात्मक कुर्बानी करावी, असेही आवाहन आयुक्तांनी केले आहे.

बकरी ईदसाठी जनावरांचे बाजार उघडावे आणि मशिदी ही खुल्या करण्यात यावी. अशी मागणी औरंगाबादच्या उलेमा संघटनांनी केला आहे. मशिदी बरोबरच सर्व धार्मिक स्थळं उघडावी अशी मागणी खासदार अम्तियाज जलील यांनी केली होती. तर शिवसेनेने मात्र याला विरोध केला होता. त्यामुळे औरंगामधील राजकारण तापलं आहे.