आताची मोठी बातमी! धाराशिवमध्ये ईडीची मोठी कारवाई, तब्बल 45 कोटींची मालमत्ता जप्त

जिल्ह्यात ईडीची दुसरी मोठी कारवाई, कारवाईने जिल्ह्यात खळबळ

Updated: Jul 8, 2022, 08:46 PM IST
आताची मोठी बातमी! धाराशिवमध्ये ईडीची मोठी कारवाई, तब्बल 45 कोटींची मालमत्ता जप्त title=

ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, धाराशिव :  धाराशिव जिल्ह्यातील एका कंपनीवर ED ने मोठी कारवाई केली आहे. उमरगा MIDC इथल्या  जोगेश्वरी ब्रेवरीज कंपनीची 45.50 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. मद्य निर्मिती करणारी ही कंपनी असून मनी लॉण्ड्रींग प्रकरणात ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून या ठिकाणचं काम बंद असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. 

कोल्हापूर इथल्या उमेश धोंडीराम शिंदे आणि देवेंद्र उमेश शिंदे हे पिता पुत्र या कंपनीचे संचालक असून फॅक्टरिची मालमत्ता आणि मशिनरी जप्त केली असल्याचेृं ईडीने ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केलं आहे. 

उमरगा MIDC मध्ये हैद्राबाद मुंबई मार्गांवर ही कंपनी असून ती सद्या बंद आहे. मनी लॉंड्रीन्ग कायद्या 2002 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

कंपनी कायद्यातर्गत जोगेश्वरी ब्रिव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची 5 मार्च 2009 रोजी नोंदणी  झाली आहे. त्यानुसार 15 कोटी हे या कंपनीची नोंदणी करतानाचे शेअर कॅपिटल आहे. तर पेड कॅपिटल हे 2 कोटी आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाची शेवटची बैठक ही 30 नोव्हेंबर 2021 रोजी झाली असून 31 मार्च 2021 पर्यंतचे ऑडिट लेखापरीक्षण करण्यात आलं आहे. 

कोल्हापूर इथल्या शिंदे रेसिडेन्सी, रुईकर कॉलनी असा या कंपनीचा नोंदणीकृत पत्ता आहे तर 133602 हा नोंदणी क्रमांक आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स या अंतर्गत याची नोंदणी असून मद्य निर्मिती हा उद्देश आहे.

जिल्ह्यात ईडीची दुसरी मोठी कारवाई
धाराशिव जिल्ह्यात ईडीची ही दुसरी मोठी कारवाई आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे. यापूर्वी ईडीने माजी मंत्री नवाब मलिक यांची उस्मानाबाद तालुक्यातील दुमले जवळा इथं असलेली 150 एकर जमीन आणि त्यावर असलेला बंगला जप्त केला होता. मलिक सध्या तुरुंगात आहेत.

मलिक यांनी मेहजबीन नवाब मलिक, सना नवाब मलिक, अमीर नवाब मलिक, निलोफर समीर खान , फराज नवाब मलिक आणि बुश्रा फराज या नावाने जमीन खरेदी केली आहे. जमीन् बागायती असताना कोरडवाहू जमीन दाखवून मूल्यांकन 1 कोटी 20 लाखाने कमी केल्यााच आरोप आहे. 

कागदोपत्री 2 कोटी 7 लाखला जमीन खरेदी केल्याचे नमूद केले मात्र प्रत्यक्षात जास्त रक्कम दिली गेल्याचा आरोप आहे. 150 एकर जमीन् खरेदी करताना आला पैसा कुठून ? हा पैसा बेनामी असल्याचा आरोप असून ही संपत्ती जप्त केली आहे. ईडीने या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करत जप्तीची कारवाई 13 एप्रिल 2022 रोजी केली होती .भाजप जिल्हाध्यक्ष नितिन काळे यांनी हे प्रकरण उचलून धरत बेनामी संपत्ती बाबत गंभीर आरोप केले होते.