पोलिसांना हक्काचे घर ते शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती आराखडा; अधिवेशनातील महत्त्वाचे निर्णय वाचा एका क्लिकवर...

कोविडच्या निर्बंधानंतर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन यशस्वीरित्या आणि पूर्णवेळ पार पडले आहे

Updated: Aug 26, 2022, 12:13 AM IST
पोलिसांना हक्काचे घर ते शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती आराखडा; अधिवेशनातील महत्त्वाचे निर्णय वाचा एका क्लिकवर...  title=
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session)पार पडलं आहे. गुरुवारी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशीही विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील आंदोलनामुळेही हे अधिवेशन चर्चेत राहिलं आहे.
 
दरम्यान अधिवेशन काळात सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटले आहे. नैसर्गिक आपत्तीत तातडीची मदत म्हणून नुकसानग्रस्त कुटुंबांना पाच हजार रुपये मदत करण्यात येत होती. त्यामध्ये तिपटीने वाढ करून पंधरा हजार रुपये अर्थसाह्य देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 
 
तसेच शेतकरी, कष्टकरी यांच्या हिताचे निर्णय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
 
कोविडच्या निर्बंधानंतर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन यशस्वीरित्या आणि पूर्णवेळ पार पडले आहे. 9 दिवसांमध्ये 6 दिवसाचे कामकाज झाले. माझ्या दृष्टीनं हे अधिवेशन खूप यशस्वी ठरले असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
अधिवेशनातील महत्त्वाचे निर्णय
 
करण्याबाबत, तसेच नवी मुंबई विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ नामकरण करण्याचा केंद्र शासनाला शिफारस करण्याचा विधान मंडळाचा ठराव.
या अधिवेशनात विविध विभागांच्या 25 हजार 826.72 कोटी रुपयांच्या पुरवणी मागणीला मंजूरी देण्यात आली.
थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक.
राज्यात “एक दिवस बळीराजा” साठी ही संकल्पना राबवणार.
सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास नुकसानभरपाई मिळणार.एनडीआरएफ पेक्षा दुप्पट मदत
पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वकष कृती आराखडा.
आपत्तीप्रवण क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच धोरण.
मुंबई पालिका क्षेत्रातील रस्ते काँक्रीटचे करणार तीन वर्षात काम पूर्ण करणार.
धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्णत्वास नेणार.
गिरणी कामगारांना 50 हजार सदनिका देण्यासाठी उपलब्ध होत आहेत. त्या त्यांना देण्यात येतील.
मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासाबाबत विशेष विकास नियंत्रण नियमावली.
बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी आवश्यकतेनुसार निधी.
बीडीडी चाळीतील पोलिसांना 15 लाख रुपयांमध्ये मालकी हक्काचे घर.
मेट्रो मार्ग 5 चा विस्तार करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील 100 टक्के व कक्षेबाहेरील 50 टक्के पदभरती करणार.
राज्यात सात हजार पोलिसांची भरती करणार.
29 हजार सफाई कर्मचाऱ्यांची घरे मालकी हक्काने देण्यात येईल.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरणार.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करणार.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढविणार.
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम युद्धपातळीवर
आश्रमशाळांसाठी 600 कोटींची तरतूद.
राज्यातील ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ करणार.
कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा कोर्स फी 
वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यातील मृतांच्या कुटूंबियांना 20 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य
राज्यात साकवांचे रूपांतर पुलांमध्ये करण्याचा निर्णय.
रेवस-रेड्डी महामार्गाच्या भूसंपादनासाठी सुमारे दीडशे कोटी रुपयांची पूरक मागणी.
पुणे शहरातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अडीचशे कोटी रुपये वर्ग.
स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो मार्गाचा प्रकल्प आराखडा केंद्राला मान्यतेसाठी पाठवला.
खडकवासला-स्वारगेट पुलगेट हडपसर-लोणी काळभोर या मार्गावर मेट्रो रेल्वे प्रकल्प. 
जलजीवन मिशन अंतर्गत रायगडमध्ये 1 हजार 70 पाणी पुरवठा योजना मंजूर.
बहिर्जी नाईक, उमाजी नाईक यांच्या स्मारक परिसराच्या विकासासाठी निधी दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्य.