भाजपने काँग्रेसची चूक पुन्हा करू नये….नितीन गडकरींनी आपल्याच पक्षाला का दिला इशारा?

Nitin Gadkari Warn BJP Party Workers: काँग्रेस जे करत होती तेच करत राहिलो तर सत्तेतून जाण्यात आणि आम्ही सत्तेत येण्यात काही अर्थ नाही, असे गडकरी म्हणाले. 

Updated: Jul 13, 2024, 10:16 AM IST
भाजपने काँग्रेसची चूक पुन्हा करू नये….नितीन गडकरींनी आपल्याच पक्षाला का दिला इशारा? title=
Bitin Gadakari Warn BJP

Nitin Gadkari Warn BJP Party Workers: भाजपने काँग्रेससारख्या चुका करू नयेत, काँग्रेस करत होती तेच आपण करत राहिलो तर फायदा नाही असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलंय ते गोव्यामध्ये बोलत होते.  भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. यावेळी त्यांनी आपल्याच पक्षाबाबत मोठं विधान केलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. काय म्हणाले गडकरी? सविस्तर जाणून घेऊया.

काँग्रेसच्या चुकांमुळेच भाजपला निवडून दिलंय

भाजप एक वेगळ्या विचारसरणीचा पक्ष असून, त्यामुळेच तो वारंवार जनतेचा विश्वास जिंकत आहे.मात्र, ज्यामुळे लोकांनी काँग्रेसला सत्तेबाहेर काढलं, त्याच चुका आपण करत राहिलो तर काँग्रेसला सत्तेतून जाण्यात आणि आपण सत्तेत येण्याला काही अर्थ राहत नाही.काँग्रेसच्या चुकांमुळेच भाजपला निवडून दिलंय असं गडकरी म्हणालेत.

'काँग्रेसच्या चुकीची पुनरावृत्ती नको'

गडकरी म्हणाले की, काँग्रेस जे करत होती तेच करत राहिलो तर सत्तेतून जाण्यात आणि आम्ही सत्तेत येण्यात काही अर्थ नाही, त्यामुळे काँग्रेसने जी चूक केली तीच चूक भाजपने करू नये, त्यामुळे त्यांना बाहेर व्हावे लागले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्याच पक्षाबाबत (भाजप) मोठे विधान केले आहे. भाजपने काँग्रेसच्या चुकीची पुनरावृत्ती करू नये, असे ते म्हणाले आहेत. गडकरी म्हणाले की, भाजप हा वेगळ्या विचारसरणीचा पक्ष आहे, त्यामुळेच तो वारंवार जनतेचा विश्वास जिंकत आहे.काँग्रेस जे करत होती तेच करत राहिलो तर त्यांच्या सत्ता सोडण्यात आणि आमच्या येण्यात काही अर्थ नाही. गडकरी पुढे म्हणाले की, काँग्रेसने जी चूक केली तीच चूक भाजपने करू नये, त्यामुळे सत्तेतून बाहेर पडावे लागले.काँग्रेसच्या चुकांमुळेच लोकांनी भाजपला निवडले, असे नागपूरचे लोकसभा खासदार गडकरी म्हणाले. 

भ्रष्टाचारमुक्त देश बनवण्यासाठी योजना हवी 

भ्रष्टाचारमुक्त देश बनवायचा आहे आणि त्यासाठी योजना आखली पाहिजे. ते म्हणाले की, राजकारण हे सामाजिक आणि आर्थिक सुधारणा घडवून आणण्याचे माध्यम आहे, हे आगामी काळात कार्यकर्त्यांनी जाणून घेतले पाहिजे. गोव्यातील पणजी येथे झालेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत गडकरी यांनी या गोष्टी सांगितल्या

भाजप एक वेगळ्या विचारसरणीचा पक्ष 

भाजप एक वेगळ्या विचारसरणीचा पक्ष असून, त्यामुळेच तो वारंवार जनतेचा विश्वास जिंकत आहे.मात्र, ज्यामुळे लोकांनी काँग्रेसला सत्तेबाहेर काढलं, त्याच चुका आपण करत राहिलो तर काँग्रेसला सत्तेतून जाण्यात आणि आपण सत्तेत येण्याला काही अर्थ राहत नाही.असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी भाजप नेत्यांना दिला.