दुर्दैवी! नातेवाईकांकडे निघाले पण काळानं गाठलं... 5 जणांनी गमवला जीव

नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी निघाले खरं पण पोहोचलेच नाहीत, आर्वी गावावर शोककळा....

Updated: Apr 23, 2022, 12:56 PM IST
दुर्दैवी! नातेवाईकांकडे निघाले पण काळानं गाठलं... 5 जणांनी गमवला जीव title=

विष्णू बुर्गे, प्रतिनिधी झी 24 तास, आंबेजोगाई : नातेवाईकांकडे निघालेली लोक पोहोचलीच नाहीत. कार्यक्रमासाठी निघाले पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. रस्त्यात काळानं घात केला. ही धक्कादायक घटना अंबाजोगाई - लातूर महामार्गावर घडली. नंदगोपाल दूध डेअरीजवळ आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ट्रक -क्रुझरचा अपघात झाला.

हा अपघात एवढा भयंकर होता की गाडीचा चक्काचूर झाला. या अपघातात 5 जणांनी जीव गमवल्याची माहिती मिळाली. कारमध्ये 7 महिला असल्याची माहिती समोर आली आहे. मृत्युमुखी झालेले आर्वी इथले रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. 

अपघातात मृत्युमुखी झालेले सर्वजण नातेवाईकांकडे एका कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी ट्रक आणि क्रुझरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात कार चालकासह 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

 या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला. पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. तर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.