पालघर लगतच्या समुद्रातील बेपत्ता २० खलाखी सापडले

पालघर जिल्ह्यातल्या समुद्रात बेपत्ता झालेले सर्वच्या सर्व 20 खलाशी आणि दोन्ही बोटी सापडल्यात. तारापूरपासून 35 मैलांवर बोटी सापडल्यात. 

Updated: Aug 31, 2017, 04:27 PM IST
पालघर लगतच्या समुद्रातील बेपत्ता २० खलाखी सापडले title=

पालघर : पालघर जिल्ह्यातल्या समुद्रात बेपत्ता झालेले सर्वच्या सर्व 20 खलाशी आणि दोन्ही बोटी सापडल्यात. तारापूरपासून 35 मैलांवर बोटी सापडल्यात. 

कोस्ट गार्डच्या मदतीनं या सर्व खलाशांचा समुद्रात शोध सुरू होता. डहाणू इथल्या रामप्रसाद बोटमध्ये समुद्रात ४०- ते ४५ मैलांवर १० खलाशी मच्छीमारी करण्यासाठी गेले होते. 

मात्र हे सर्व खलाशी बुडत असल्याचं कळताच १० खलाशी प्रेमप्रसाई बोटीनं या सर्वांना वाचवण्यासाठी निघाले. त्यांनी यशस्वीरीत्या बुडत असलेल्या सर्वांना वाचवले. मात्र माघारी येत असलेल्या या सर्व २० खलाशांचा संपर्क तुटला. या दोन्ही बोट नवाबंदर गुजरातमधल्या आहेत.