पार्टनरसोबत वाद झाल्यावर कधीच करु नका 'या' चुका, गोष्टी अजून बिघडतील

जोडीदारासोबत वाद झाल्यावर अनेकांना तो मिटवायचा असतो. पण तो वाद काही शांत होण्याचं नाव घेत नाही. अशावेळा तुम्ही केलेल्या चुकाच याला कारणीभूत ठरतात. वाद झाल्यावर पुढील 3 गोष्टी कधीच करु नका. यामुळे मतभेद अधिक वाढतील. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 30, 2024, 12:16 PM IST
पार्टनरसोबत वाद झाल्यावर कधीच करु नका 'या' चुका, गोष्टी अजून बिघडतील  title=

जोडीदारासोबत भांडण झाल्यावर लवकर तोडगा काढायचा असा अनेकांचा कल असतो. पण विचार जरी तसा असला तरीही कृती वेगळीच घडते आणि वाद वाढत जातो. महत्त्वाचं म्हणजे आपल्या पार्टनरसोबत वाद झाल्यावर त्यावर तोडगा काढण्याचा विचार केला जातो. पण हे करत असताना केलेल्या 3 चूका महागात पडू शकतात.  अनेक वेळा, समेट घडवून आणण्याच्या प्रक्रियेत, गोष्टी चुकीच्या होतात आणि नंतर आपल्याला पश्चात्ताप करण्याशिवाय काहीही मिळत नाही. आजच्या लेखात आपण या गोष्टींबद्दल बोलणार आहोत.

नातेसंबंधांमध्ये वाद हे सामान्य आहेत आणि ते सतत होत राहणे आवश्यक आहे, कारण काही प्रमाणात यामुळे नात्यात गोडवा राहतो. कारण जोपर्यंत संभाषण थांबत नाही आणि आपल्याला एकमेकांचे तोंड पाहणे आवडत नाही तोपर्यंत ही परिस्थिती हाताळता येते. भांडणानंतर जाणूनबुजून किंवा नकळत केलेल्या काही गोष्टींमुळे वाद वाढल्याच्या समस्या दिसून येतात. आज 3 गोष्टी पाहणार आहोत ज्या तुम्ही भांडणानंतर टाळल्या पाहिजेत, तरच प्रकरण शांत होईल अन्यथा नाही.

वादाच्या कारणाकडे लक्ष केंद्रित करु नका

अनेकदा कपलमधील वाद हा काही वेळात शांत होऊ शकतो. पण जर जोडप्याने आपला वाद का झाला याची सतत आठवण केली तर तो वाद शमण्याच नाव घेत नाही. त्यामुळे जर तुम्हाला वाद संपवायचा असेल तर भांडण कोठून सुरू झाले याबद्दल बोलू नका. जेव्हा ती तुमची चूक असेल किंवा ती ठिणगी पुन्हा पेटवू शकते. भांडण कुठून सुरू झाले यावर चर्चा करून सामंजस्याचा विचार करत असाल तर आपली चूक होत आहे. अनेक वेळा यामुळे पार्टनरचा राग आणखी वाढतो.

समेट करण्याचे ढोंग करू नका

जर तुम्ही वाद मिटवण्याचा आणि शांतता निर्माण करण्याचा विचार करत असाल तर ते दाखवण्यासाठी नव्हे तर मनापासून करा. कारण बऱ्याच वेळा खोट्या भावना बाहेर येतात आणि मग त्यावरून नवा वाद सुरु होतो. चूक तुमची असेल तर ती सहज मान्य करा, सॉरी म्हणा आणि त्यात समोरच्या व्यक्तीची चूक असली तरी गोष्टी आणि परिस्थिती समजून घेऊन प्रकरण संपवण्याचा विचार करा. पण बहुतेक जोडपी फक्त समेट घडवून आणण्याचे नाटक करतात. रिलेशनशिप एक्सपर्ट्सचे मत आहे की, हे तुमच्या रिलेशनशिपसाठी चांगले नाही, जर तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत काही समस्या असेल तर त्यावर चर्चा करून तोडगा काढा.

अजिबात घाई करू नका

वाद सोडवण्यासाठी घाई करण्यात अर्थ नाही. जर एखाद्या गंभीर मुद्द्यावरून वाद झाला असेल तर तुमच्या जोडीदाराला शांत होण्याची संधी द्या. बोलून तोडगा काढणे हा योग्य मार्ग आहे, पण यासाठी योग्य संधीची वाट पहा. रागाच्या भरात योग्य गोष्टही चुकीची वाटते आणि योग्य निर्णय घेणे कठीण जाते. भांडणानंतर, टोमणे मारण्याची आणि शिव्या देण्याची सवय सोडून द्या आणि काही काळ एकमेकांना एकटे सोडा. पण त्यानंतर हा विषय कसा शांत होईल याची काळजी घ्या.