वाराणसीत पुलाचा भाग कोसळला, १२ जणांचा मृत्यू

वाराणसीच्या केंन्ट रेल्वे स्टेशनजवळ बांधकाम सुरू असलेला उड्डाणपूल कोसळलाय. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Updated: May 15, 2018, 06:51 PM IST
वाराणसीत पुलाचा भाग कोसळला, १२ जणांचा मृत्यू title=

उत्तर प्रदेश : वाराणसीच्या केंन्ट रेल्वे स्टेशनजवळ बांधकाम सुरू असलेला उड्डाणपूल कोसळलाय. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आणि बचाव पथक दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे.