प्रेयसीची हत्या करुन मृतदेह 2 वर्षे ड्रममध्ये, हाडांची पावडर करुन...' अंगावर काटा आणणारी घटना

GirlFriend Murder: राहुल राजने प्रेयसी भानुप्रियाची हत्या करुन तिचा मृतदेह 2 वर्षे घरात पुरुन ठेवला. कालांतराने मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागला. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 22, 2024, 06:33 PM IST
प्रेयसीची हत्या करुन मृतदेह 2 वर्षे ड्रममध्ये, हाडांची पावडर करुन...' अंगावर काटा आणणारी घटना  title=
Udaipur Murder

GirlFriend Murder: लिव्ह इन रिलेशनशिपच्या नात्याचा धक्कादायक अंत समोर आला आहे. माणूसकीला काळीमा फासणारी, क्रूरतेची सीमा पार करणारी घटना उदयपूर येथे घडली आहे. एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केली आणि तिचा मृतदेह दोन वर्षे घरात ठेवला. पुढे जे झालं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल आणि खूनी प्रियकराबद्दल घृणा उत्पन्न होईल. एका महिलेच्या हत्येचा 4 वर्षानंतर खुलासा झाला आहे. बेकायदा पिस्तुल बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी राहुलराज चतुर्वेदी या युवकाला अटक केली होती. या तरुणाकडून पोलिसांना त्याच्या आधीच्या गुन्ह्याबद्दल माहिती मिळाली. 4 वर्षांपुर्वी राहुलराज एका महिलेसोबत राहत होता. भानुप्रिया असे या महिलेचे नाव होते.  भानुप्रिया गेल्या 4 वर्षांपासून गायब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान पोलिसांनी तरुणाची कसून चौकशी केली. त्यात त्यानेच महिलेची हत्या केल्याचे कबुल केले. 

राहुल राजने प्रेयसी भानुप्रियाची हत्या करुन तिचा मृतदेह 2 वर्षे घरात पुरुन ठेवला. कालांतराने मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागला. आता काय करावे त्याला कळेना. यावेळी त्याने घरमालकाची मदत घेतली आणि मृतदेह जाळला. त्याला आता मृतदेह जाळलेल्याचा पुरावा नष्ट करायचा होता. आता त्याने राख नदीत फेकली. राहुलसोबत राहणारी भानुप्रिया अनेक वर्षांपासून गायब असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आजुबाजूला तिच्याबद्दलची कुजबूज सुरु झाली होती.

'क्राईम पेट्रोल' पाहून मिळाली आयडिया 

पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आरोपी राहुलराज पोपटासारखा बोलू लागला. आपण क्राईम पेट्रोल सीरियलचे 1300 एपिसोड पाहिल्यानंतर अशाप्रकारे हत्या आणि मृतदेह ड्रममध्ये ठेवल्याची आयडिया सुचल्याचे राहुलराजने सांगितले. मृतदेह ठेवल्यानंतर त्याने ड्रम सिमेंटने झाकून ठेवला. त्यामुळे त्याचा शोध लागला नाही.

का केली हत्या? 

राहुल राज हा आधी राजसमंद राजनगर येथील सत्यनारायण पालीवाल यांच्या घरात भाड्याने राहत होता. दुसरीकडे भानुप्रिया आणि नारायण गिरी गोस्वामी यांच्यात घटस्फोट होऊन ते वेगळे झाले होते.  त्यानंतर ती राहुल राजसोबत लिव्ह इनमध्ये राहू लागली होती. पण राहुला तिला रोज मारहाण करायची. 12 मे 2020 रोजी दोघांमध्ये मोठा वाद झाला. यात राहुलला राग अनावर झाला आणि त्याने रागाच्या भरात भानुप्रियाला संपवण्याचा निर्णय घेतला. यानंतर राहुलराजने आपली प्रेयसी भानुप्रिया हिचा गळा आवळला. यातच तिचा मृत्यू झाला. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर राहुल राज याने भानुप्रियाचा मृतदेह लपवल्याची, जाळल्याची जागा दाखवली. भानुप्रियाला जाळून तिची राख राहुलराजने बनास नदीच्या पुलावरुन खाली टाकली होती. यानंतर भानुप्रियाचा खून झाला असून तो राहुलनेच केल्याचे पोलिसांन स्पष्ट झाले.