पीएम मोदींना राहुल गांधींचा रोखठोक सवाल

 देशाचे चौकीदार म्हणवून घेणारे मोदी गप्प का? असा सवाल राहुल

Updated: Apr 29, 2018, 02:31 PM IST
पीएम मोदींना राहुल गांधींचा रोखठोक सवाल title=

नवी दिल्ली : गुजरातमध्ये काँग्रेसचा विजय थोडक्यात चुकला असला तरी कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड इतकंच नाही, तर 2019च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसची सत्ता येणार, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. नवी दिल्लीत रामलीला मैदानावर मोदी सरकारविरोधात आक्रोश व्यक्त करण्यासाठी काँग्रेसने जनआक्रोश रॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी राहुल गांधींच्या निशाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच होते. 

भ्रष्टाचार, देशातील बलात्काराच्या घटना यावर देशाचे चौकीदार म्हणवून घेणारे मोदी गप्प का? असा सवाल राहुल गांधींनी यावेळी केला. तसंच मोदींच्या चीन दौ-यावरही राहुल यांनी निशाणा साधला. चीनच्या राष्ट्राध्यक्षांसमोर मोदींनी डोकलामचा मुद्दा का उचलला नाही असा प्रश्नही राहुल यांनी विचारला.