मोदी केवळ या पाच जणांना मदत करतात - राहुल गांधी

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. केंद्र सरकार फक्त पाच उद्योगपतींची मदत करते, असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय.

Updated: Nov 11, 2017, 09:25 PM IST
मोदी केवळ या पाच जणांना मदत करतात - राहुल गांधी title=

अहमदाबाद : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. केंद्र सरकार फक्त पाच उद्योगपतींची मदत करते, असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय.

शेतकऱ्यांच्या जमिनी लाटून त्या उद्योगपतींना दिल्याचा आरोप राहुल गांधी यांनी अहमदाबादमध्ये केलाय. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी दौऱ्यावर आहेत, त्यावेळी त्यांनी हा आरोप केला आहे.

राहुल गांधी यांनी सकाळी अक्षरधाम मंदिराला भेट दिली. यानंतर घेतलेल्या सभेत राहुल यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे.