लॉकडाऊन नसते तर देशात इतकी भयंकर असती स्थिती

लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आलं आहे.

Updated: Apr 11, 2020, 09:40 PM IST
लॉकडाऊन नसते तर देशात इतकी भयंकर असती स्थिती title=

मुंबई : कोरोना विषाणूने भारतासह संपूर्ण जगाला संकटात टाकलं आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे. सध्या, या प्राणघातक विषाणूचा सामना करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे लॉकडाउन आणि सामाजिक अंतर. हे सर्व असूनही, भारतासह संपूर्ण जगात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

भारतात आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे 7528 हून अधिक लोक बाधित झाले आहेत, त्यापैकी 242 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील 643 लोक बरे झाले आहेत. 24 मार्च रोजी मोदी सरकारने देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केले नसते तर आत्तापर्यंत परिस्थिती खूपच बिकट झाली असती.

शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव्ह अग्रवाल यांनी म्हटलं की, 'जर देशभरात लॉकडाउन नसतं केलं तर कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये 41 टक्क्यांनी वाढली असती आणि 1 एप्रिलपर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 8.20 लाखांवर पोहोचली असते'

'जर फक्त कंटेनमेंट केले तर 15 एप्रिलपर्यंत कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या एक लाख 20 हजारांपर्यंत पोहोचली असती. शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी सांगितले की, काल देशात कोरोना विषाणूमुळे 40 लोकांचा मृत्यू झाला, तर कोरोनाचे 1035 नवीन रुग्ण आढळले.'

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी भारताने वेगवान तयारी केली असल्याची माहितीही त्यांनी दिली. 'देशात 586 सीओव्हीआयडी 19 रुग्णालये आणि एक लाखाहून अधिक आयसोलेशन बेड आणि 11 हजार 500 आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत देशात एक लाख 71 हजार 718 लोकांची कोरोना चाचणी झाली आहे. शुक्रवारी 16 हजार 564 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली.'

गृह मंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी म्हटलं की, 'शनिवारी गृह मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांना आवश्यकतेनुसार सुरक्षा देण्यात यावी अशी विनंती केली आहे.'