घुसखोरी करणाऱ्या ४ दहशतवाद्यांना केलं ठार

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्यानं सलग दुस-या दिवशी पाकिस्तानच्या हल्ल्याचा कट उधळून लावला आहे.

Updated: May 27, 2017, 10:28 AM IST
घुसखोरी करणाऱ्या ४ दहशतवाद्यांना केलं ठार title=

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्यानं सलग दुस-या दिवशी पाकिस्तानच्या हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. रामपूर सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणा-या चार दहशतवाद्यांना भारतीय लष्कराच्या जवानांनी ठार केलं आहे. या ठिकाणी आणखी काही दहशतवादी लपले असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यामुळे लष्कराकडून या भागात सर्च ऑपरेशन सुरु आहे.

कालच उरी सेक्टरमध्ये भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमचा हल्ल्याचा प्रयत्न परतवून लावला होता. यावेळी भारतीय जवानांनी बॅटच्या दोन कमांडोंना ठार मारलं होतं. भारतीय लष्कराचं गस्तीपथक नियंत्रण रेषेजवळ गस्त घालत असताना पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमचा या भागात वावर असल्याचं दिसून आलं. त्यानंतर  भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे दोन कमांडो मारले गेले.