दुपारच्या जेवणानंतर तुम्हाला ही ऑफिसमध्ये येते का झोप? मग ही ट्रिक वापरा पुन्हा कधीही येणार नाही झोप

आज आम्ही तुम्हाला यामागचं कारण आणि त्यावरील उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे पुढच्या वेळेपासून तुम्हाला ऑफिसमध्ये झोप येणार नाही.

Updated: Jun 20, 2022, 07:39 PM IST
दुपारच्या जेवणानंतर तुम्हाला ही ऑफिसमध्ये येते का झोप? मग ही ट्रिक वापरा पुन्हा कधीही येणार नाही झोप title=

मुंबई : बऱ्याचदा दुपारच्या जेवणानंतर लोकांना झोपेची समस्या उद्भवते. पोट भरलं की, लोक दुपारनंतर खूपच स्लो होतात आणि परिणामी त्यांना डुलक्या येऊ लागतात. लोकांचं शरीर पूर्णपणे सुस्तावतं आणि मग त्यांना दुसरं काहीही करावंस वाटत नाही. अशावेळी आपण काम जरी करण्याचा प्रयत्न केला. तरी आपल्या हातून ते काम बरोबर होत नाही किंवा एखादी चूक तरी घडतेच. त्यामुळे आपल्याला दुपारी ऑफिसमध्ये झोप येऊ नये यासाठी अनेक लोक प्रयत्न करतात. परंतु त्याचा फारसा काही फायदा होत नाही.

आज आम्ही तुम्हाला यामागचं कारण आणि त्यावरील उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे पुढच्या वेळेपासून तुम्हाला ऑफिसमध्ये झोप येणार नाही.

तुम्हाला माहितीय का? की दुपारी झोप येण्यामागचं कारण आहे तुमचं जेवण. ज्यामुळे तुम्हाला असं सुस्तावल्या सारखे वाटते. त्यामुळे अशा वेळी दुपारच्या जेवणात कोणत्या गोष्टी खाव्यात आणि कोणते पदार्थ टाळावेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

दुपारच्या जेवणात हे पदार्थ टाळा:

द स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मते, दुपारच्या जेवणात प्रथिने आणि कार्ब्स सारख्या गोष्टी खाल्ल्याने झोप येते. जसे की,
- चीज
- जास्त मीठचे अन्न
- सी फूड 
- तांदूळ
- गोड इ.

दुपारच्या जेवणात कोणते पदार्थ खावेत?

ऑफिसमध्ये जेवण करताना खालील गोष्टी खाव्यात. जेणेकरून अन्न खाल्ल्यानंतर झोप येत नाही आणि चांगले काम करता येते.
- वाफवलेल्या भाज्या
- भाकरी
- मसूर किंवा बीन्स
- मोड आलेले धान्य
- हंगामी फळे
- दही इ.

जेवल्यानंतर येणारी झोप कशी टाळावी?

दुपारचे जेवण खाल्ल्यानंतर  झोप टाळायची असेल, तर या हेल्थ टिप्स नक्की फॉलो करा.

- थोडं थोडं खा. पोट भर जेवण करु नका
- दुपारच्या जेवणानंतर, थोडेसे चालत जा किंवा पायऱ्या चढा
- दुपारच्या जेवणात मिठाई किंवा गोड खाणे टाळा
- भाताऐवजी चपाती खा
- कधीकधी च्युइंगम चघळा
- पुरेसे पाणी प्या

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)