Health Tips : मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर गोड खावे की पाणी प्याव? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

eating spicy food  : कुठल्याही गोष्टीचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक आणि धोकादायकच ठरते. अन्न आणि साखरेची लालसा काही लोकांना प्रचंड असते. इच्छा असूनही ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. 

श्वेता चव्हाण | Updated: Jan 14, 2024, 05:43 PM IST
Health Tips : मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर गोड खावे की पाणी प्याव? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला  title=

Health Tips in Marathi : आजारांपासून दूर राहणे आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. अनेकदा या आजारांमुळे जीवाला धोका होण्याची शक्यता असते. अनेकजण आहारात नको त्या पदार्थांचा समावेश असतो. ज्याचा नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. काही लोकांना मसालेदार पदार्थ खाण्याची सवय असते.

काही लोकांना मसालेदार अन्न इतके आवडते की ते खाण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये असे बरेच लोक असतील ज्यांना मसालेदार, अतिप्रमाण आणि तिखट पदार्थ खायला आवडतात. तथापि, कोणत्याही वेळी मसालेदार पदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. मसालेदार पदार्थ खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. अनेकदा तिखटपणा कमी करण्यासाठी पाणी पितात. पण काहीजण लगेचच गोड पदार्थ खातात. पण असे करणे कितपत फायद्याचे आहे. जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला..

दुग्धजन्य पदार्थ

मिरची खाल्ल्यानंतर थंड गोड दही किंवा दुधाचे सेवन केले तर ते जादूसारखे काम करू शकते. मिरचीमध्ये असणाऱ्या कॅप्सेसिनचा प्रभाव कमी करून ते आराम देऊ शकते.

पाणी पिल्यास काय आहेत?

मिरची कोणत्याही मसालेदार डिशला मसालेदार बनवण्याचे काम करते आणि त्यात असलेले कॅप्सेसिन संयुगे मिरचीमध्ये मसालेदारपणा वाढवतात. या कंपाउंड मुळेच तोंडाला आग लागल्यासारखे वाटते. तेल आधारित कंपाऊंड असुन आणि तोंडावर देखील परिणाम देतात, पण जेव्हा तुम्ही मिरची खाल्यानंतर पाणी पितात त्यावेळी ते पाण्यासोबत तुमच्या पोटात पसरते. तुमची चिडचिड होऊ लागते

गोड खाण्याचे फायदे

मिरची खाल्ल्यानंतर मिठाई खात असताना, मिरचीमध्ये असणारे कॅप्सेसिन नावाचे संयुग लगेच शोषून घेण्यास सुरुवात होते. काही वेळातच जिभेची तीक्ष्णता कमी होते. त्यामुळे तिखटपणा कमी करण्यासाठी पाण्याऐवजी गोड पदार्थांचे सेवन केले तर त्याचा अधिक परिणाम  जाणवतो.