अक्षय कुमारसोबतचं नातं का तोडलं? रवीना टंडन म्हणाली- 'दर आठवड्याला मुली...'

Raveena Tandon on Broken Engagement Akshay Kumar : रवीना टंडननं एका मुलाखतीत तिच्या आणि अक्षय कुमारच्या तुटलेल्या नात्यावर वक्तव्य केलं होतं. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 20, 2024, 07:01 PM IST
अक्षय कुमारसोबतचं नातं का तोडलं? रवीना टंडन म्हणाली- 'दर आठवड्याला मुली...' title=
(Photo Credit : Social Media)

Raveena Tandon on Broken Engagement Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि अक्षय कुमार तब्बल 20 वर्षांनी एकत्र काम केलं. दोघं लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ मध्ये दिसणार आहे. अशात रवीनाची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशात रवीनाची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या मुलाखतीत रवीना तिच्या आणि अक्षयच्या मोडलेल्या साखरपुड्याविषयी बोलताना दिसते. खरंतर, 1994 मध्ये ‘मोहरा’ च्या शूटिंगच्या वेळी कथितपणे अक्षय आणि रवीना एकमेकांच्या प्रेमात होते. दोघे काही काळ रिलेशनशिपमध्ये होते. इतकंच नाही तर कुटुंबाच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा देखील झाला. पण 1998 मध्ये असं काही तरी झालं की ते दोघं विभक्त झाले.

गेल्या वर्षी एएनआयनं पॉडकास्ट दरम्यान, रवीनाला त्याच्या आणि अक्षय कुमारच्या मोडलेल्या साखरपुड्याविषयी विचारलं होतं. सुरुवातीला रवीनानं सांगितलं की 'ती विसरली की तिचा आणि अक्षयचा साखरपुडा कधी झाला होता. मग त्यांनी सांगितलं की मोहराच्या वेळी आम्ही हिट जोडी ठरलो होतो. आजही आम्ही कोणत्याही कार्यक्रमात एकमेकांसमोर येतात तर चांगल्या पद्धतीनं एकमेकांना भेटतात. त्यानंतर ते बोलताना देखील दिसतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात पुढे नक्कीच जातो. कॉलेजमध्ये मुली दरआठवड्याला त्यांचे बॉयफ्रेंड्स बदलताना दिसतात. पण हा साखरपुडा मोडला होता हे कायम माझ्या डोक्यात राहिली आहे आणि ते का राहिलं हे मला नाही माहित. प्रत्येक व्यक्ती आयुष्यात पुढे जातो. लोकं घटस्फोट घेतात, ते आयुष्यात पुढे जातात, त्यात नवीन काय आहे?' 

रवीनानं अक्षय कुमारशी नातं मोडल्यानंतर जवळपास सहा वर्षांनंतर चित्रपट निर्माता अनिल थडानी यांच्याशी लग्न केलं. अक्षय कुमारनं 2001 मध्ये ट्विंकल खन्नासोबत सप्तपदी घेतल्या आहेत. 

हेही वाचा : 'मुलांना शिकवण्याची वेळ आलीये', काजोलनं नीसा आणि युगचा फोटो शेअर करत दिला सल्ला

दरम्यान, रवीना आणि अक्षयची जोडी ही कधीकाळी सगळ्यात गाजलेल्या कपल्सपैकी एक होती. त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. त्या दोघांनी फक्त मोठ्या पडद्यावर नाही तर त्यासोबत खऱ्या आयुष्यात देखील एकत्र रहावे. मात्र, काही कारणांमुळे ते शक्य झालंच नाही. दरम्यान, आता त्या सगळ्या गोष्टी मागे राहिल्या असून आता त्यांच्या चाहत्यांना त्या दोघांना पुन्हा एकदा चित्रपटात पाहण्याची आतुरता वाढली आहे.