परिस्थितीला कंटाळून स्वतःला संपवण्याचा केला विचार आणि.... उर्फी जावेद सोबत काय घडलं?

ती हसतमुख जरी दिसत असली तरी उर्फीने सुसाईड करण्याचा विचार केला आहे की काय अशी गंभीर चर्चा पसरू लागली आहे. 

Updated: Jul 21, 2022, 10:51 AM IST
परिस्थितीला कंटाळून स्वतःला संपवण्याचा केला विचार आणि.... उर्फी जावेद सोबत काय घडलं? title=

मुंबईः आजकाल सोशल मीडियावरून चाहत्यांना घायाळ करणारे व्हिडीओ आणि फोटो टाकणारी उर्फी जावेद सध्या भलतीच पॉप्यूलर आहे. तिच्यामागे सध्या नाना तऱ्हेचे फॅन्स फिरत असतात आणि तिला प्रश्न विचारून चांगले भडसावून सोडतात. त्यातून उर्फी तिच्या फॅशन स्टायलिंगमुळे सतत चर्चेत राहते. सोशल मीडियावरच नाही तर सगळीकडेच तिची हवा आहे आणि सगळीकडेच तिची आणि फक्त तिचीच चर्चा आहे. 

खरंतर ही अवलीशी पोरंगी आपल्या अतरंगी कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. तेव्हा तिला लोकं प्रेझ करतात तर कधी तिला लोकं चांगलेच ट्रोल करतात. एकीकडे सतत हसतमुख कॅमेऱ्याला फेस करणारी ही उर्फी सध्या एका विशेष चिंतेत आहे. ही चिंता नक्की कोणती आणि ती डिप्रेशनमध्ये आहे का?, असे प्रश्न विचारत सध्या तिचे चाहते भलतेच टेंशनमध्ये आहेत. ती हसतमुख जरी दिसत असली तरी उर्फीने सुसाईड करण्याचा विचार केला आहे की काय अशी गंभीर चर्चा पसरू लागली आहे. 

बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेदने मुंबईत घर नसताना तिच्या आयुष्यातील सर्वात काळ्या काळाबद्दल खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली की, तिचे मनं खूपच उदास झाले आहे. आपण एवढे फेमस असूनही आपण हरलो आहोत आणि आपल्याला हार मानल्यासारखे वाटते आहे त्यामुळे ''मी फार उदास आहे'', असं ती म्हणाली आहे. 

ती पुढे म्हणाली की तिला फार आर्थिक परिस्थितीचा आणि अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे तिचा स्ट्रगल हा फारच शॉकींग होता. ती त्या काळात तर अक्षरक्षः बेघर होती आणि एकी काळी तर ती रस्त्यावरही झोपली आहे. पण आज ती जी काही आहे ती याच स्ट्रगलमुळे आहे. उर्फीने हे देखील उघड केले की तिला अनेक वेळा हे जग सोडायचे होते, तिला आत्महत्या करायची होती. पण त्या कठीण काळात तिने हार मानली नाही याचा तिला आनंद आहे. 

ती म्हणते की तिच्याकडे पलंग आणि रजाईही नव्हती तेव्हा त्या काळात ती जमिनीवर झोपली आहे. पण आता तिच्याकडे सर्वकाही आहे ती खूप खुश आहे. तिने असेही सांगितले की बऱ्याचदी तिला हार मानायची होती. परिस्थितीतला कंटाळून स्वतःचे काहीतरी बरेवाईट करून घ्यायचे होते पण तिने तसं केलं नाही. ती पुढे म्हणाली, “प्रत्येकजण नैराश्यासारख्या भावनांमधून जातो, जेव्हा तुमच्याकडे पैसे नसतात, खायला पैसे नसतात किंवा तुमच्या कुटुंबाला पोट भरण्यासाठी आत्महत्येचे विचार येतात. माझ्या जगण्याच्या इच्छेमुळे मी हे सर्व जगू शकले आहे. आत्महत्या करण्याइतपत मी अशक्त आहे. जेव्हा जेव्हा कोणी मला खाली खेचले तेव्हा ते चुकीचे सिद्ध करण्यासाठी मला अधिक जिद्दी देवाने तयार केले.''

तिच्या प्रवासाबद्दल बोलताना उर्फी जावेदने सांगितले की, “एक समय पे मै पार्क वजिरा पे बी सोयी हूं, दोस्त के घर कुछ दिनो के लिए रेही हूं.'' ''तू तो शो मै साईड रोल करते ही रे जाई, तू तो ऐसा ही है, तू तो गरीब है.” अशाच एका घटनेची आठवण करून देताना ती म्हणाली की.'' एकदा मी एका मोठ्या हॉटेलमध्ये गेले होते तेव्हा तिचा एका वेटरने अपमान केला आणि तो म्हणाला की तू काय मोठी स्टार नाहीस, येथे मोठे स्टार्स येतात इथून निघं... 

करण जोहर होस्ट केलेला रिअॅलिटी शो 'बिग बॉस ओटीटी'मध्ये दिसली होती.