'लागिरं झालं जी' मधील 'ते' पाच जण पुन्हा एकत्र

कोण आहेत हे 5 कलाकार?

Updated: Oct 28, 2019, 01:43 PM IST
'लागिरं झालं जी' मधील 'ते' पाच जण पुन्हा एकत्र  title=

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे 'लागिरं झालं जी' या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच ओळख निर्माण केली. मालिकेतील अज्या (नितिश चव्हाण), राहुल्या (राहुल मगदुम ), भैया (किरण गायकवाड) विक्या (निखिल चव्हाण) आणि टॅलेंट (महेश जाधव) या कलाकारांनी प्रेक्षकांच मन जिंकलं. 

मालिके व्यतिरिक्त हे पाचही जण खूप चांगले मित्र आहेत. मालिकेच्या शुटिंगनंतरही हे पाच जण अनेकदा एकत्र दिसले. कधी पुरस्कार सोहळ्यात तर कधी इतर ठिकाणी. या पाच जणांनी आपल्या अभिनयातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

'लागिरं झालं जी' ही मालिका बंद होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. तरीही या कलाकारांचा अभिनय त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. असं असताना यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. 

निखिल, नितिश, महेश, राहुल आणि किरण एका नव्या प्रोजेक्टमुळे पुन्हा एकत्र येणार आहे. या सगळ्यांना इंस्टाग्रामवर नव्या प्रोजेक्टचे फोटो शेअर केले आहेत. 'दंगा घालायला यालोय, पाडव्याच्या मुहूर्तावर सांगा लागलोय, याय लागतंय, सुट्टी नाय! असं कॅप्शन देत हा फोटो शेअर केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

यारी

A post shared by Mahesh Jadhav (@mahesh_jadhav15) on

या संदर्भात अज्या म्हणजे निखिलशी संवाद साधला असता, 'हो, आम्ही पुन्हा पाच जण एकत्र काम करत असल्याचं म्हटलं'. हा प्रोजेक्ट नेमका काय आहे? कशाबद्दल आहे याची कोणतीच माहिती नितिशने आता दिलेली नाही. 

'लागिरं झालं जी' आणि या पाच जणांच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. अज्या आणि शितलीच्या लव्हस्टोरीमध्ये या चारही जणांचा खूप महत्वाचा वाटा आहे. मालिका फुलवण्यासाठी या पाच जणांच योगदान अतिशय महत्वाचं आहे.