मालिकेतील ही अभिनेत्री अडकली विवाहबंधनात

पाहा कुणाचं झाल लग्न 

मालिकेतील ही अभिनेत्री अडकली विवाहबंधनात title=

 मुंबई : बॉलिवूडमधील एकापाठोपाठ एक लग्नानंतर आता मालिकांमधील कलाकार देखील लग्नबंधनात अडकत आहेत. 2018 हे वर्ष प्रत्येक कलाकारासाठी खास आहे. यावर्षी अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले. बॉलिवूड असो वा मालिका कलाकारांच्या चाहत्यांना हा सुखद धक्का मिळाला आहे. 

बॉलिवूडस्टार दीपवीरनंतर देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि परदेशी बॉयफ्रेंडसोबत उमेद भवनमध्ये अगदी राजेशाही थाटात लग्नबंधनात अडकली. त्यापाठोपाठ भारतातील अग्रगण्य बिझनेसमन मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आज लग्नबंधनात अडकली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#Exclusive: Tv star @parulchauhan19 is all set to take the wedding vows with @chirag.thakkar  #TellyTalkIndia #TellyNews #tvnews #tvshows #tv #ParulChauhan #Wedding #IndianWedding #WeddingVibes #Bride #Groom #TVserial #chiragthakkar #video #Swipe #Album

A post shared by Telly Talk India (@tellytalkindia) on

आता या पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीच्या लग्नाची माहिती समोर आली आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत सुवर्णाचं कॅरेक्टर साकारणारी अभिनेत्री पारूल चौहान लग्नबंधनात अडकली आहे. पारूलने अभिनेता चिराग ठक्करसोबत लग्नगाठ बांधली आहे. 

30 वर्षांच्या पारूल आणि चिरागचं लग्न मुंबईतच पार पडलं. पारूल यावेळी लाल रंगाच्या साडीत दिसली तर चिराग सफेद रंगावर गोल्डन वर्क असलेली शेरवानी घातली आहे. 

अशी झाली दोघांची ओळख बिदाई या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या पारूल चौहानची ओळख चिरागशी एका मित्रामुळे झाली. 3 वर्षांपूर्वी 2015 मध्ये या दोघांची भेट झाली. दोघं चांगले मित्र बनले. पारूल सांगते की, तिला चिरागने कधी प्रपोझ केलं नाही. पण ते एकमेकांसोबत वेळ घालवत. आणि हेच जर डेटिंग असेल तर हो आम्ही एकमेकांना डेट करत असल्याचं पारूल सांगते.