प्रियांका चोप्राने 'भारत' सोडल्यावर सलमान खान म्हणाला ...

अभिनेता सलमान खानच्या आगामी 'भारत' चित्रपटातून प्रियांका चोप्राची एक्झिट झाली आहे. 

Updated: Aug 8, 2018, 05:19 PM IST
प्रियांका चोप्राने 'भारत' सोडल्यावर सलमान खान म्हणाला ... title=

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या आगामी 'भारत' चित्रपटातून प्रियांका चोप्राची एक्झिट झाली आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक अली अब्बास जफरने याबाबत ट्विट केले होते. मात्र सलमान खानने याबाबत तेव्हा काहीच प्रतिक्रिया दिलेली नव्हती. 'लवरात्री'च्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात सलमान खानने मीडियाशी बोलताना प्रियांकाच्या एक्झिटचं कारण सांगितलं आहे.  

काय म्हणाला सलमान खान ? 

सलमान खानने मीडियाला माहिती देताना, प्रियांका चोप्रा घरी आल्याची माहिती दिली आहे. प्रियांकाने 'भारत' न करण्याची इच्छा बोलून दाखवल्यानंतर आपण तिला या चित्रपटातून बाहेर पडू शकतेस असे सांगितले. मात्र तेव्हा आम्हांला दिलेलं कारण वेगळं असल्याचं सलमान म्हणाला आहे. तसेच शुटिंग शेड्युलच्या फक्त 10 दिवस आधी ही माहिती दिल्याने आम्ही नाराज असल्याचेही त्याने सांगितले. जर प्रियांकाने आधीच आम्हांला ही माहिती दिली असती तर आम्ही तिला कदापि अडवले नसते असेही सलमान खान म्हणाला.  

 

प्रियांकाला शुभेच्छा 

प्रियांकाने लग्नाचे कारण पुढे करत 'भारत' सोडला, तू तिच्या लग्नाला जाणार का ? असा प्रश्नही त्याला विचारण्यात आला. त्यावर सलमान खान 'हो' म्हणाला आहे. सलमान खानने प्रियांका शुभेच्छा देत 'भारत' मधून मोकळं केले असले तरीही तिच्या एकंदर कारणं पुढे करण्याबाबत 'भारत' ची टीम प्रियांकावर नाराज आहे.  

कॅटरिना कैफ झळकणार  

प्रियांका चोप्राची 'भारत'मधून एक्झिट झाल्यानंतर आता कॅटरिना कैफने 'भारत' हा सिनेमा स्विकारल्याची माहिती अली अब्बास जफरने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.