एका घटनेनं कायमस्वरुपी बदललंलं सलमान-ऐश्वर्याचं नातं; जाणून घ्या नेमकं काय घडलं 

 इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार्सच्या यादीत सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नावाचा समावेश आहे

Updated: Apr 5, 2022, 01:57 PM IST
एका घटनेनं कायमस्वरुपी बदललंलं सलमान-ऐश्वर्याचं नातं; जाणून घ्या नेमकं काय घडलं  title=

मुंबई : इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार्सच्या यादीत सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नावाचा समावेश आहे. हे दोघं केवळ त्यांच्या चित्रपटांसाठीच नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही ओळखले जातात. आज आम्‍ही तुम्‍हाला सलमान खान आणि ऐश्‍वर्या रायच्‍या आयुष्‍याशी संबंधित एका अशा  घटनेबद्दल सांगणार आहोत, ज्याने त्‍यांच्‍या लव्‍ह लाइफमध्‍ये खळबळ उडवून दिली होती आणि हीच घटना अखेर त्‍यांच्‍या ब्रेकअपचं मोठं कारण बनल्‍याचं बोललं जातं.

सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकेकाळी एकमेकांच्या खूप जवळ आले होते. 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली होती. यानंतर सलमान खान आणि ऐश्वर्या राय अनेकदा एकत्रही दिसले. ऐश्वर्या सलमान खानच्या आयुष्यात येईपर्यंत अभिनेता इंडस्ट्रीतलं एक मोठं नाव बनला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानकडे नाव, पैसा, फॅन फॉलोइंग सगळं काही होतं. त्यामुळे सलमानने लग्न करुन सेटल व्हावं अशी त्याची इच्छा होती. सलमान खानला ऐश्वर्या रायकडूनही अशीच कमिटमेंट हवी होती मात्र, ऐश्वर्या त्यावेळी इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेत होती आणि तिला लग्न करायचं नव्हतं. बातम्यांनुसार, यामुळे सलमान आणि ऐश्वर्यामध्ये तणाव निर्माण झाला होता.

मात्र, हे सगळं सुरू असताना एका रात्री सलमान खान ऐश्वर्या रायच्या घरी पोहोचला आणि मध्यरात्रीच्या सुमारास त्याने अभिनेत्रीच्या घराबाहेर तमाशा केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खान रात्री ऐश्वर्या रायच्या फ्लॅटचा दरवाजा वाजवत राहिला पण अभिनेत्रीने दरवाजा उघडला नाही. ही घटना दुस-या दिवशी हेडलाईन्समध्ये आली आणि त्यामुळे सलमान आणि ऐश्वर्या दोघांची ईमेज खराब झाली. या घटनेनंतरच ऐश्वर्याने सलमान खानपासून दूर राहण्याचं ठरवलं.