कोट्यवधींचं बजेट आणि सात दिवसांतच फ्लॉप Mission Raniganj; अक्षय कुमार म्हणतो, 'चला ऑस्करला!'

Mission Raniganj: ऑस्करला भारतीय चित्रपटांना नेण्याचे वेड सुरू झाले आहे. त्यातून आता अक्षय कुमारचा सर्वात फ्लॉप चित्रपट झालेला चित्रपट आहे. त्यामुळे हा चित्रपट ऑस्करला जाणार असल्याची आता चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

गायत्री हसबनीस | Updated: Oct 13, 2023, 08:09 PM IST
कोट्यवधींचं बजेट आणि सात दिवसांतच फ्लॉप Mission Raniganj; अक्षय कुमार म्हणतो, 'चला ऑस्करला!'    title=
mission raniganj to go to oscar says reports

Mission Raniganj:खरंतर मागील वर्षी RRR या चित्रपटानं ऑस्कर मिळवून एक वेगळाच इतिहास घडवला आहे. 'लगान' त्याआधी 'मदर इंडिया' असे अनेक चित्रपट हे ऑस्करपर्यंत गेले होते. त्यामुळे या चित्रपटांची जोरात चर्चा रंगलेली होती. भारतीय कलाकारांनी अनेकदा ऑस्करवर आपली मोहोर उमटवली आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती. मागील वर्षी 'नाटू नाटू' या गाण्यासाठी ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. भारतीय चित्रपटाला कधी एकदा ऑस्कर पुरस्कार प्राप्त होणार याची सर्वच भारतीयांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्यातून आता अक्षय कुमारचा रानीगंज हा चित्रपट ऑस्करला जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता हा चित्रपट ऑस्करला नेण्याचे प्लॅन्स सुरू झाले आहेत. परंतु यावरून नेटकरी मेकर्सना ट्रोल करत आहेत. यावेळी आपल्याला दिसून येईल की, या चित्रपटानं फारशी कमाई बॉक्स ऑफिसवर तरी अद्याप केलेली नाही. 

या चित्रपटाची फारशी चर्चाही दिसली नाही. त्यातून अचानकच या चित्रपटाची चर्चा सुरू झाली होती. त्यातून आता या चित्रपटाला ऑस्करला नेण्याचे प्लॅन्स निर्मात्यांनी सुरू केले आहेत. त्यामुळे याची जरा जास्त चर्चा सुरू झाली आहे. नक्की मेकर्सचा काय प्लॅन आहे. हे आपण आता यातून जाणून घेऊया. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, ही फिल्म स्वतंत्र्यरीत्या ऑस्करला घेऊन जाणार असल्याची चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे याची जोरात चर्चा रंगलेली आहे. सध्या आपण पाहू शकतो की या चित्रपटाचा विषय हा सत्य घटनेवर आधारित आहे. त्यामुळे या चित्रपटानं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

हेही वाचा : मृत्यूतांडव! अक्षय कुमारच्या 'मिशन रजनीगंज'च्या कथेची पुनरावृत्ती

सध्या या चित्रपटाच्या निमित्तानं अक्षय कुमार यानं अनेक मुलाखतीही दिल्या होत्या. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहेत. यावेळी त्यानं आपल्या कॅनडाच्या सिटीझनशिपवरही भाष्य केले आहे. त्यानंतर आपल्याला ज्याप्रकारे मोदी भक्त म्हणून संबोधले जाते. यावरही त्यानं स्पष्ट भुमिका ही मांडली आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे अक्षय कुमारच्या नागरिकत्वाची. तुम्हाला माहितीये का की यावेळी त्यानं आपल्या अनेक भुमिका या स्पष्ट केल्या आहेत. 

वाशु भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख,  अजय कपूर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. त्यामुळे या चित्रपटाची जोरात चर्चा रंगलेली आहे. सुरेश देसाई यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.