बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानला 2 लग्न केल्यानंतरही का वाटतेय लग्नची भीती?

सैफने एक नाही तर चक्क 2 लग्न केली तरीही म्हणतो, 'मला या कारणामुळे वाटते लग्नाची भीती'

Updated: Sep 15, 2021, 06:48 PM IST
बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानला 2 लग्न केल्यानंतरही का वाटतेय लग्नची भीती? title=

मुंबई: बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानने दोन लग्न केल्यानंतर आता आपल्याला लग्नाची भीती वाटते असं म्हटलं. त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. द कपिल शर्मा शो दरम्यान सैफने याबाबत सांगितल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना तर उधाणच आलं आहे. या शोचा एक प्रोमो सध्या चर्चेत आहे. या प्रोमोमध्ये सैफनं आपल्याला लग्नाची भीती वाटत असल्याचं सांगितलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार द कपिल शर्मा शोच्या निमित्तानं भूत पोलीसची टीम सेटवर आली होती. त्यावेळी सैफने लग्नाची भीती वाटत असल्याचं सांगितलं. त्यानंतर अनेकांनी आश्चर्यानं भुवया उंचावल्या. कपिलने यामी गौतमीला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला. त्यावरून हा विषय निघाला होता. याच दरम्यान सैफनं आपलं लग्नाबद्दलचं मत सांगितलं. 

2012 मध्ये करीना कपूरसोबत झालेल्या लग्नाची आठवण करून देताना सैफ म्हणाला की, तो करीनासोबत इंटमेट अफेअर होतं. त्यानंतर आम्ही लग्न केलं. त्यावेळी आम्ही ठरवलं होतं की फक्त जवळच्या आणि कुटुंबातील सदस्यांना लग्नासाठी आमंत्रण द्यायचं. पण कपूर कुटुंबातीलच किमान 200 जण लग्नसाठी आले होते. 

सैफ विनोद करत पुढे म्हणाला की, 'मला मोठ्या बजेटच्या लग्नाची भीती वाटते. मी महागड्या लग्नांना घाबरतो. मला चार मुलं आहेत. त्यामुळे महागड्या लग्नाबद्दल नुसता विचार केला तरी भीती वाटते असंही सैफ म्हणाला आहे.' 

करिना आणि सैफला दोन मुलं आहेत. एक तैमूर आणि दुसरा जहांगीर. तर पहिल्या पत्नीपासून सारा अली खान इब्राहिम अली खान अशी चार मुलं आहेत. सैफची बहीण सोहा अली खान त्याला गॉडफादार देखील म्हणते. एका मुलाखतीमध्ये शर्मिला टागोर यांनी सैफ उत्तम बाप आणि तेवढाच चांगला शेफ असल्याचं म्हटलं आहे.