अनेक अडथळे दूर करत काढला मार्ग- कंगना राणावत

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावत हिने आपले मानसिक आरोग्य राखण्यासाठी खूप मेहनत घेतली असल्याचे स्पष्ट केले.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 31, 2017, 04:57 PM IST
अनेक अडथळे दूर करत काढला मार्ग- कंगना राणावत  title=
फोटो सौजन्य : सोशल मीडिया

मुंबई : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावत हिने आपले मानसिक आरोग्य राखण्यासाठी खूप मेहनत घेतली असल्याचे स्पष्ट केले.

एका ब्रॅण्ड ऍन्डॉर्समेंटच्या दरम्यान कंगनाने सांगितले की, "मी अशा कुटुंबातून आली आहे ज्याचा बॉलीवूडशी काही संबंध नाही. फक्त माझ्या पॅशन आणि स्वप्नांमुळे मी इथपर्यंत पोहचले आहे. मात्र हा रस्ता सोपा नव्हता. यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या संपूर्ण काळात स्वतःला मानसिकरित्या सक्षम करण्यासाठी मी खूप गोष्टीचा सामना केला. त्यानंतर हळू हळू मार्ग दिसत गेला आणि मग मी माझ्या यशाच्या मार्गात कोणालाही येऊ दिले नाही. कंगनाने सांगितले की, बॉलिवूडमध्ये मी असमानतेचा सामना केला आहे. अनेकदा सहकलाकारासोबत खांद्याला खांदा लावून काम केले आहे. त्यातूनच मी सक्षम झाले."

कंगनाची बॉलिवूडमधील अनेक वर्ष वादात गेली. काही वाद तर सार्वजनिक झाले. कंगना सध्या मणिकर्णिका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट राणी लक्ष्मीबाईच्या जीवनावर आधारीत आहे. त्यानंतर ती 'तेजू' या चित्रपटातून दिगदर्शकाच्या भूमिकेत दिसेल.