‘दीप-वीर’च्या लग्नाचं नेमकं काय झालं?

कलाविश्वात सध्या लग्नसराईचे वारे वाहत आहेत हे खरं. पण...

Updated: Sep 26, 2018, 11:14 PM IST
‘दीप-वीर’च्या लग्नाचं नेमकं काय झालं?  title=

मुंबई: कलाविश्वात सध्या चित्रपटांसोबतच आणखी एका गोष्टीचे वारे वाहत आहेत. ते म्हणजे लग्नसराईचे. सेलिब्रिटी जोड्यांची नाती आणि त्यांना मिळणारी वळणं या साऱ्याचीच कलाविश्वात चर्चा सुरु आहे. अशा या वातावरणात चाहत्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांच्या लग्नाची.

काही दिवसांपूर्वीच रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाची अधिकृत घोषणा करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. नोव्हेंबर महिन्यात ते दोघंही एकमेकांसोबत विवाहबंधनात अडकणार होते. पण, आता मात्र हे चित्र काहीसं बदललं आहे.

‘रिपब्लिक टीव्ही’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दीपिका आणि रणवीरच्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

तेव्हा आता या वृत्तानुसार दीप-वीर यंदाच्या वर्षी नव्हे, तर पुढच्या म्हणजेच २०१९ या वर्षाच्या सुरुवातीला विवाहबंधनात अडकणार आहेत. 

लग्नाची तारीख पुढे का ढकलण्यात आली यामागचं कारणं अद्यापही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. तेव्हा आता यामागचं नेमकं कारण का, हा प्रश्न अनेकांनाच सतावत आहे. 

इटलीमध्ये डेस्टीनेशन वेडिंगचा थाट दीपिका आणि रणवीरच्या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने पाहता येणार आहे. पण, आता यातही कोणते बदल केले जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

खुद्द दीपिका आणि रणवीर यांच्याकडून याविषयीची कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या चर्चांना तेच पूर्मविराम देऊ शकतील असं म्हणणं वावगं ठरणार नाही.