कुणामुळे तुटलं अक्षय कुमार- रवीना टंडनचं नातं?

...नात्याचा तोल गेला आणि सारी गणितं चुकली 

Updated: Sep 1, 2021, 08:13 PM IST
कुणामुळे तुटलं अक्षय कुमार- रवीना टंडनचं नातं?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : प्रेम करणं जितकं सोपं असतं तितकंच ते टिकवणं कठीण असतं. कोणत्याही नात्यामध्ये दोन व्यक्तींचं योगदान, त्यांची एकमेकांना असणारी साथ आणि एकमेकांवर असणारा विश्वास अतिशय महत्त्वाच्या भूमिका बजावतात. नात्यात आलेली नकारात्मकता याच बळावर दूर लोटली जाऊ शकते. पण, यापैकी एकही बाजू कमकुवत पडली तर, मात्र नात्याचा तोल जातो आणि सगळी गणितं चुकतात. 

बॉलिवूडमध्ये आजवर कधी एकेकाळी अतिशय चांगल्या मार्गावर असणाऱ्या नात्यांना गालबोट लागल्याच्या घटना पाहायला मिळाल्या आहेत. अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अभिनेत्री रवीना टंडन यांचं नातंही त्यापैकीच एक. एकमेकांवर प्रेम करुन या दोघांनी साखरपुडाही केला, गोष्टी लग्नापर्यंत पोहोचल्या पण अगदी टोकाशी गेल्यावर फासे फिरले आणि या नात्याला तडा गेला. 

'मोहरा' चित्रपटानंतर खिलाडी कुमार आणि रवीनाच्या नात्याच्या चर्चा सर्वज्ञात झाल्या. तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर एका मंदिरात त्यांनी गुपचूप साखरपुडा केल्याचं म्हटलं गेलं होतं. पण, 1996 मध्ये 'खिलाडीयों का खिलाडी' या चित्रपटापासून त्यांच्या नात्यात दुरावा येण्यास सुरुवात झाली. अक्षय आणि रेखा यांच्यामध्ये वाढती जवळीक यासाठी कारणीभूत असल्याचं म्हटलं गेलं. पण, मुळात रवीना आणि अक्षयचा ब्रेकअप झाला तेव्हा मात्र तो शिल्पा शेट्टीला डेट करत असल्याचं म्हटलं गेलं. 

यादरम्यान, रवीना अक्षयवर इतकी संतापली होती की, एका मुलाखतीमध्ये तिनं असं काही म्हटलं ज्यानं सर्वांचं लक्ष वेधलं. 'अक्षय कुमारला प्रत्येक सुंदर मुलीलाल प्रपोज करण्याची सवय आहे. मुंबईतील 75 टक्के मुलींच्या आईबाबांना तो आईबाबा म्हणतो. त्याच्याकडे सर्वकाही आहे पण प्रामाणिकपणा नाही', असं ती म्हणाली होती. 

परीचे एक्स्प्रेशन्स पाहून तुम्हीही म्हणाल, अरे ही किती गोड रे.... 

 

रवीना आणि अक्षयचं नातं तुटणं अनेकांना धक्का देणारं ठरलं. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्रीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या जोडीनं एका सुरेख वळणावर नातं सुरु केलं खरं, पण या नात्याचा शेवट मात्र फार वाईट वळणावर झाला. कोणालाही नको असाच...