विमानतळावर अचानक पापाराझींना पाहताच अनुष्का शर्मानं लपवला चेहरा, अन् त्यानंतर...

Anushka Sharma : अनुष्का शर्मा मुंबईत परतली आहे. त्यानंतर तिला पापाराझींनी तिला स्पॉट केल्यानंतर तिनं चेहरा लपवला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 23, 2024, 06:51 PM IST
विमानतळावर अचानक पापाराझींना पाहताच अनुष्का शर्मानं लपवला चेहरा, अन् त्यानंतर... title=
(Photo Credit : Social Media)

Anushka Sharma : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या बऱ्याच दिवसांपासून अर्थात अकायच्या जन्मापासून लंडनमध्ये राहत होती. काही दिवासांपूर्वी एका कार्यक्रमासाठी ती मुंबईत आली होती त्यानंतर आता नुकतीच ती पुन्हा एकदा अनुष्का मुंबईत परतली आहे. दरम्यान, यावेळी अनुष्का शर्मा ही गाडीत बसली असताना पापाराझींना पाहताच ती तिचा चेहरा लपवून लागली. कॅमेरा पाहून तिला अस्वस्थ वाटू लागल्याचं दिसत होतं. 

अनुष्का शर्मानं पापाराझीला पाहताच चेहरा लपवू लागली होती. तर दुसरीकडे ती पापाराझींकडे दुर्लक्ष करताना दिसली. काही नेटकरी म्हणाले की अनुष्का ही तिच्या तिच्या विचारात गुंतल्याचे दिसते. पापाराझींचं लक्ष हे अनुष्कावर लागलंय, तर दुसरीकडे तिला पापाराझींना पाहून आनंद झालेला नाही हे तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. 

अनुष्का आणि विराट हे दोघं मिळून त्यांची दोन्ही मुलं वामिका आणि अकायचा सांभाळ करत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या वर्क कमिटमेंट्सना देखील ते पूर्ण करत आहेत. तर अनुष्का तिच्या वर्क कमिटमेंटमुळेच भारतात आली आहे. काही दिवसांपूर्वी अनुष्का आणि विराट दोघे मुंबईमध्ये कृष्ण दास यांच्या कीर्तनात सहभागी झाले आहे. या आधी अनुष्का शर्मा ही सप्टेंबरमध्ये मुंबईत आली होती आणि तेव्हा तिनं पापाराझींना खूप पोज दिल्या होत्या. दरम्यान, अनुष्का मुंबईत का आली आहे त्याचं कारण मात्र अजून समोर आलेलं नाही. आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. 

हेही वाचा : घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना अभिषेक बच्चन म्हणतो- 'मला काही तरी बोलायचंय!'

दरम्यान, आई झाल्यानंतर अनुष्का शर्मा तिचा सगळ्यात जास्त वेळ हा कुटुंबाला देत आहे. तर त्यासोबत ती तिचा आगामी चित्रपट 'चकदा एक्सप्रेस' मुळे देखील चर्चेत आहे त्यासोबत ती त्याच्या प्रमोनश किंवा येणाऱ्या सगळ्या तयारीला लागली आहे. या चित्रपटातून तिच्या पडद्यावरील कमबॅकची प्रेक्षक आतुरतेनं प्रतीक्षा करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अनुष्का आणि विराट लंडनमध्ये स्थायिक होण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं जात आहे. हे दोघं त्यांच्या मुलांसोबत बऱ्याच काळापासून लंडनमध्ये राहत आहे. तर असं देखील म्हटलं जातं की असं होण्याची शक्यता आहे की आता लंडनमध्ये स्थायिक होणार आहे. हे सगळे सुत्र 'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिले आहेत.