'या' 8 चुकांचा ऐश्वर्याला आजही पश्चाताप; पाहा कुठं फसली सौंदर्यवती

ऐश्वर्याच्या आयुष्यातील या सर्वात मोठ्या चुका 

Updated: Nov 1, 2021, 02:08 PM IST
'या' 8 चुकांचा ऐश्वर्याला आजही पश्चाताप; पाहा कुठं फसली सौंदर्यवती title=

मुंबई : जगातील सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नॅशनल ते इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर खूप लोकप्रिय आहे. बॉलिवूडप्रमाणेच ऐश्वर्या हॉलिवूडमध्ये देखील चर्चेत असते. आता ऐश्वर्या अभिनयात कमी दिसत असली तरीही एकेकाळी निर्माता - दिग्दर्शकाची पहिली पसंत आहे. ऐश्वर्याला मॉडेलिंग करत असतानाच अभिनयाच्या अनेक संधी आल्या. मात्र तिने त्या नाकारल्या. ज्याचा आजही ऐश्वर्याला पश्चाताप होत असेल. 

राजा हिंदुस्तानी 

करिश्मा कपूरचे स्टारडम दुप्पट करणारा 'राजा हिंदुस्तानी' पहिल्यांदा ऐश्वर्या राय बच्चनला ऑफर करण्यात आला होता. ऐश्वर्याला मिस वर्ल्ड होण्यापूर्वीच हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता. पण ऐश्वर्याने तो चित्रपट नाकारला. फेमिनाला दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितले होते की, तिच्या मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये मोठे चित्रपट निर्माते त्यांच्या चित्रपटांसाठी तिला संपर्क करू लागले. धर्मेश दर्शनने 'राजा हिंदुस्तानी'साठी संपर्क केल्याचे तिने सांगितले होते. पण ऐश्वर्याने तो चित्रपट नाकारला. ती मणिरत्नम आणि राजीव मेनन यांच्या कामाची चाहती असल्याने तिने पदार्पणासाठी त्यांचा 'इरुवर' हा चित्रपट निवडला. 'इरुवर' हा सिनेमा फार चालला नाही, पण 'राजा हिंदुस्तानी' हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. या सिनेमाने करिश्मा कपूरला स्टार बनवले.

कुछ कुछ होता है 

कुछ कुछ होता है' या चित्रपटासाठी ऐश्वर्या रॉयलाही अप्रोच करण्यात आले होते. ऐश्वर्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला या चित्रपटात राणी मुखर्जीची भूमिका ऑफर करण्यात आली होती. पण काही कारणांमुळे तिने ही ऑफर नाकारली.1999 मध्ये 'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने याबद्दल सांगितले होते, 'मी त्यावेळी नवीन असूनही माझी तुलना सर्व ज्येष्ठ अभिनेत्रींसोबत केली जात होती. जर मी तो चित्रपट केला असता तर सर्वांनी म्हटले असते की, ऐश्वर्याने मॉडेलिंगच्या काळात जे केले तेच इथेपण केलं. मिनीज घालून कॅमेऱ्यासमोर ग्लॅमरस पाऊट देतात. जर मी 'कुछ कुछ होता है' केले असते तर मला लिंच केले असते.

दिल तो पागल है 

'दिल तो पागल है' या चित्रपटासाठी ऐश्वर्या रॉयलाही अप्रोच करण्यात आले होते. 'फेमिना'ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने याचा खुलासा केला आहे. ऐश्वर्याने सांगितलं की, यश चोप्रा यांना 'मै तो मोहब्बत कर ली' या चित्रपटातून लॉन्च करायचे होते. पण ऐश्वर्याने हा चित्रपट नाकारला. नंतर तो चित्रपट 'दिल तो पागल है' म्हणून प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते.

मुन्नाभाई एमबीबीएस 

संजय दत्त आणि ग्रेसी सिंग स्टारर 'मुन्नाभाई एमबीबीएस' मध्ये देखील ऐश्वर्या राय याआधी आली होती? मात्र अभिनेत्रीने नंतर हा चित्रपट नाकारला. त्यानंतर ही भूमिका ग्रेसी सिंगला देण्यात आली. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि ग्रेसी सिंगचेही खूप कौतुक झाले.

वीर झारा 

शाहरुख खान स्टारर 'वीर झारा' या चित्रपटासाठी ऐश्वर्याला अप्रोच करण्यात आले होते. या चित्रपटात शाहरुख वीरच्या भूमिकेत दिसला होता, तर ऐश्वर्याला झाराच्या भूमिकेसाठी अप्रोच करण्यात आले होते. या चित्रपटात राणी मुखर्जीच्या भूमिकेसाठी ऐश्वर्याला साईन करण्यात आल्याचीही चर्चा होती, मात्र ऐश्वर्याने काही कारणास्तव या चित्रपटाची ऑफर नाकारली.

दोस्ताना 

ऐश्वर्याला 'दोस्ताना'ची ऑफरही आली होती. रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्याचे शेड्यूल त्यावेळी खूप पॅक होते आणि तारखा नसल्यामुळे तिने करण जोहरचा चित्रपट करण्यास नकार दिला होता. नंतर त्यात प्रियांका चोप्राला साइन करण्यात आले.

बाजीराव मस्तानी 

संजय लीला भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी ऐश्वर्याची पहिली पसंती होती. भन्साळींना पहिल्यांदा सलमान खान आणि ऐश्वर्या रायसोबत हा चित्रपट बनवायचा होता. पण सलमान आणि ऐश्वर्याच्या ब्रेकअपच्या ब्रेकअपमुळे ते शक्य झालं नाही. हा चित्रपट वर्षानुवर्षे अडकला आणि त्यानंतर संजय लीला भन्साळी यांनी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगसोबत तो तयार केला.

भूल भुलैया 

'भूल भुलैया' चित्रपटातील मंजुलिकाच्या भूमिकेसाठी ऐश्वर्या रॉयला अप्रोच करण्यात आले होते. ऐश्वर्याने ही भूमिका करण्यास नकार दिल्याने विद्या बालनला साईन करण्यात आले.