Abhishek Bachchan च्या नशीबात हे काय? बायकोसोबत ती आली आणि...

ऐश्वर्या रायसोबत लग्न केल्यानंतर अभिषेक बच्चन सुखी जीवन जगत असेल, पण प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो आणि अभिषेक ज्याच्याबद्दल सर्वांना माहिती आहे. अभिषेकचे नाते सर्वप्रथम कपूर कुटुंबाची लाडकी करिश्मा कपूर हिच्यासोबत पक्के झाले होते हे सर्वांनाच माहीत आहे.

Updated: Oct 23, 2022, 08:32 PM IST
Abhishek Bachchan च्या नशीबात हे काय? बायकोसोबत ती आली आणि...  title=

Abhishek Bachchan and Kareeshma Kapoor: ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांच्या लग्नाआधी अभिषेकचं लग्न त्याच्या आईनं म्हणजे जया बच्चन यांनी कपूर घराण्याची लेक करिश्मा कपूर हिच्याशी ठरले होते. परंतु हे लग्न मात्र काही ठरू शकलं नाही. त्यानंतर करिश्मा कपूरनं (Karishma Kapoor) मोठ्या बिझनेसमनशी लग्न केलं आणि अभिषेकनं 2007 साली ऐश्वर्याशी विवाहबंध झाला आता दोघांना एक मुलगीही आहे. परंतु करिश्मा आणि अभिषेकच्या लग्नाच्या चर्चा आजही होताना दिसतात. आता पुन्हा एकदा अशीच एक चर्चा रंगली आहे आणि तीही एका फोटोवरून. (abhishek bachchan wife aishwarya rai bachchan and kareeshma kapoor comes toghter face to face)

ऐश्वर्या रायसोबत लग्न केल्यानंतर अभिषेक बच्चन सुखी जीवन जगत असेल, पण प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो आणि अभिषेक ज्याच्याबद्दल सर्वांना माहिती आहे. अभिषेकचे नाते सर्वप्रथम कपूर कुटुंबाची लाडकी करिश्मा कपूर हिच्यासोबत पक्के झाले होते हे सर्वांनाच माहीत आहे. दोघांनीही एंगेजमेंट केली होती पण नंतर अचानक हे नातं तुटलं आणि दोन्ही कुटुंबांमध्ये एक न पाहिलेली भिंत उभी राहिली. यानंतर अभिषेक आणि करिश्मा कधीही एकत्र दिसले नाहीत आणि दोघेही एकमेकांसमोर येण्याचे टाळत राहिले. त्यानंतर अनेक वर्षांनी दोघेही मनीष मल्होत्राच्या (Manish Malhotra diwali Party) दिवाळी पार्टीत आमनेसामने आले होते. 

हेही वाचा - 'मी कोणाला पैसे...', लोकप्रिय अभिनेत्रीनं आपल्या बॉलिवूड एन्ट्रीबद्दल केला धक्कादायक खुलासा

करिश्मा कपूरही मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत पोहोचली होती ज्याचे काही फोटो तिनं इंस्टाग्रामवर शेअर केले. यातील एका फोटोची सर्वाधिक चर्चा होत आहे कारण या फोटोमध्ये ऐश्वर्या राय करिश्मासोबत पोज देताना दिसत आहे. करिश्मा आणि ऐश्वर्याचा हा पहिलाच फोटो एकत्र आला आहे. या फोटोमुळे लोकांना पुन्हा एकदा करिश्मा आणि अभिषेकच्या लग्नाच्या त्या गोष्टी आठवल्या आहेत. करिश्मा आणि अभिषेक या पार्टीत एकमेकांना भेटण्यास टाळाटाळ करत होते पण ऐश्वर्यांनं मात्र तसे केले नाही. त्या दोघींचे बॉण्डिंग आजही तसेच आहे. (Karishma Kapoor and Aishwarya Rai Bachchan) 

2002 मध्ये अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या एंगेजमेंटची घोषणा झाली. ही लगबग मोठ्या थाटामाटात पार पडली. त्यावेळी मीडियासमोर जया बच्चन यांनी करिश्माला तिची सून म्हणून संबोधले. पण नंतर लग्न मोडल्यानंतर त्यांच्या विभक्त होण्यावरून अनेक चर्चां रंगल्या होत्या.

हेही वाचा - तो किस्सा सांगताना अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या डोळ्यात आलं पाणी, आवंढा गिळत म्हणाला...

काहींनी जया बच्चन यांची कठोर वृत्ती यामागे कारणीभूत असल्याचे सांगितले, तर काहींनी सांगितले की बबिता या नात्यावर खूश नव्हती कारण अभिषेकने तेव्हाच त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. मात्र आजपर्यंत दोन्ही कुटुंबीयांनी याचे खरे कारण सांगितले नाही.