Corona : जगात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता भारताने घेतला महत्त्वाचा निर्णय

आरोग्य मंत्रालयाने जगातील विविध देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

Updated: Oct 20, 2021, 08:38 PM IST
Corona : जगात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता भारताने घेतला महत्त्वाचा निर्णय title=

नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयाने जगातील विविध देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे (new guidelines) जारी केली आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना निगेटिव्ह आरटी-पीसीआर चाचणी अहवाल दाखवणे अनिवार्य असेल. कोरोनाच्या डेल्टा प्रकाराची उत्परिवर्तन आवृत्ती ब्रिटनमध्ये कहर करत आहे. 11 ऑक्टोबरपासून दररोज तेथे 40 हजारांहून अधिक कोरोनाची प्रकरणे (corona cases) नोंदवली जात आहेत, त्यामुळे त्याचा भारतावर परिणाम होऊ नये, म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आरटी-पीसीआर चाचणी (RT-Pcr test) 48 तास आधी करणं सक्तीचं केलं आहे.

या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशावर कडक कारवाई केली जाऊ शकते, असे निवेदनात म्हटले आहे. कोरोना संसर्गामुळे 23 मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली होती, परंतु मे 2020 पासून वंदे भारत मिशन अंतर्गत विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवली जात आहेत. याशिवाय, निवडक देशांसोबत द्विपक्षीय हवाई बबल व्यवस्थेअंतर्गत जुलै, 2020 पासून उड्डाणे चालवली जात आहेत.

देशांतर्गत उड्डाणांवरील निर्बंध उठवले

यापूर्वी, सरकारने 18 ऑक्टोबर रोजी देशांतर्गत उड्डाणांवरील निर्बंध उठवले होते. नवीन आदेशानंतर, 100 टक्के प्रवासी देशातील घरगुती विमानांमध्ये प्रवास करु शकतात. यापूर्वी 18 नोव्हेंबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान विमान 85 टक्के क्षमतेने उड्डाण करत होते.

नागरी उड्डयन मंत्रालयाच्या आदेशात असे म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पूर्वीप्रमाणे विमान आणि विमानतळांवर पालन केले जाईल. प्रवासादरम्यान, कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करा असेही म्हटले आहे.