कोरोनाचं आणखी एक लक्षण आलं समोर, डोळे पाहून ओळखा

कोरोनाच्या बाबतीत जगभरात संसोधन सुरु आहे. ज्यामध्ये अनेक नवीन नवीन गोष्टी समोर येत आहेत. 

Updated: Apr 17, 2020, 10:09 AM IST
कोरोनाचं आणखी एक लक्षण आलं समोर, डोळे पाहून ओळखा title=

मुंबई : जगभरात कोरोना विषाणूचं थैमान सुरु असताना आता कोरोनाचे नवीन नवीन लक्षणं समोर येत आहेत. कोरोनाव्हायरसशी संबंधित नवीन संशोधनातून असे समोर आले आहे की डोळ्याच्या रंगावरुन देखील कोरोना आहे की नाही हे लक्षात येऊ शकेल.

वास्तविक, जेव्हा कोरोना विषाणू चीनच्या वुहानमधून पसरू लागला, तेव्हा त्यातील दोन लक्षणे मुख्य असल्याचे मानले गेले. कोरडा खोकला आणि ताप ही लक्षणे होती. नंतर, विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना, श्वास घेताना अडचण येण्याची लक्षणे दिसू लागली. आता कोरोना विषाणूच्या लक्षणांमध्ये एक नवीन गोष्ट जोडली गेली आहे की, जर तुमचे डोळे गुलाबी असले तरीही ती कोरोना विषाणूची लक्षणे असू शकतात.

अमेरिकेच्या नेत्रतज्ज्ञांच्या असोसिएशनने कोविड -१९ च्या रुग्णांमध्ये डोळ्यांच्या लक्षणांवर आधारित एक संशोधन केले असून असे नमूद केले आहे की, नेत्ररोगतज्ज्ञ रूग्णांना कोरोनाशी संबंधित सामान्य लक्षणे विचारतात. जर रुग्णांमध्ये ही लक्षणे आढळली तर त्याला कोरोनाव्हायरस चाचणी घेण्याचा सल्ला दिला पाहिजे. असोसिएशनने नेत्ररोग तज्ञांना रुग्णांसाठी सर्व प्रतिबंधात्मक पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे.

अमेरिकन तज्ञांनी देखील याची पुष्टी केली आहे की नुकत्याच चिनी संशोधकांनी केलेल्या संशोधनात असेही मानले जात होते की डोळ्याच्या अश्रूंच्या माध्यमातून देखील कोरोना व्हायरस पसरत आहे. कोरोना विषाणूच्या 38 रूग्णांवर हे संशोधन केले गेले असून जवळपास डझनभर संक्रमित व्यक्तींचे डोळे गुलाबी म्हणजे गुलाबी रंगाचे झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

कोरोनाची इतर लक्षणं

- श्वास घेण्यात अडचण
- ताप हा कोरोनाच्या मुख्य लक्षणांपैकी एक आहे
- खोकला देखील कोरोनाच्या लक्षणांपैकी एक आहे
विषाणूच्या लक्षणांमध्ये गंभीर सर्दी आणि शरीरात वेदना होतात.

या सर्व व्यतिरिक्त, कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये इतर अनेक प्रकारची लक्षणे आढळतात. ज्यामध्ये वास घेण्याची आणि चव घेण्याची क्षमता संपते, घसा खवखवणे देखील कोरोनाच्या मुख्य लक्षणांपैकी एक मानले जाते. आणि आता डोळ्याचा रंग गुलाबी होतो तो देखील कोरोनाच्या लक्षणांमध्ये समाविष्ट आहे.

भारतात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हे लक्षात घेऊन संपूर्ण भारत लॉकडाऊन जाहीर केले आहे. आतापर्यंत या विषाणूपासून मुक्त होण्यासाठी कोणतीही लस तयार केलेली नाही. परंतु त्याच्या लक्षणांच्या आधारे, डॉक्टर त्याच्या उपचारांमध्ये इतर आवश्यक औषधे वापरत आहेत. तथापि, अनेक देशांमध्ये त्याची लस बनवण्याचे काम सुरू आहे.

भारतातील कोरोना विषाणूच्या घटनांविषयी बोलताना, ताज्या आकडेवारीनुसार, संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 12700 वर गेली आहे, तर 420 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

दुसरीकडे जॉन हॉपकिंग्स युनिव्हर्सिटीच्या कोरोना ट्रॅकरनुसार या साथीच्या आजाराची लागण झालेल्या लोकांची संख्या 21 लाखांच्या पुढे गेली आहे, तर 1 लाख 43 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे सातत्याने वाढत आहेत.