Pakistan Earthquake: हरनईमध्ये मोठा भूकंप, आतापर्यंत 20 लोकांचा मृत्यू

पाकिस्तानच्या बलुचिस्तान (Balochistan) प्रांतातील हरनई भागात आज सकाळी भूकंपाचे (Pakistan Earthquake) तीव्र धक्के जाणवले.  

Updated: Oct 7, 2021, 08:13 AM IST
Pakistan Earthquake: हरनईमध्ये मोठा भूकंप, आतापर्यंत 20 लोकांचा मृत्यू   title=

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान (Balochistan) प्रांतातील हरनई भागात आज सकाळी भूकंपाचे (Pakistan Earthquake) तीव्र धक्के जाणवले. पाकिस्तानी माध्यमांनुसार, आतापर्यंत या दुर्घटनेत किमान 20 जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 150 लोक जखमी झाले आहेत. (Earthquake in Pakistan)

भुकंपाची तीव्रता 5.9 रिश्टर स्केल  

बलुचिस्तान प्रांतातील (Balochistan Provinces) क्वेटा जिल्ह्यातील हरनई भागात पहाटे 3.30 वाजता भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. नॅशनल तेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता 5.9 रिश्टर स्केलवर नोंदवली गेली होती. भूकंपाची तीव्रता जास्त असल्याने अनेक घरांचे नुकसान झाले. याशिवाय आसपासच्या अनेक जिल्ह्यांमध्येही नुकसान झाले आहे.

मदत आणि बचाव कार्य सुरू  

बलुचिस्तानच्या प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रमुखाने एएफपीला सांगितले की, आतापर्यंत 15 ते 20 लोकांचा बळी गेला आहे आणि मृतांचा आकडा वाढू शकतो. अपघातानंतर मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. जखमींना बलुचिस्तान प्रांतातील (Balochistan Provinces) हरनई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

भूकंप का होतो?

पृथ्वीच्या आत 7 प्लेट्स (थर) आहेत, ज्या सतत फिरत असतात. जिथे या प्लेट्स अधिक टक्कर देतात, त्या झोनला फॉल्ट लाइन म्हणतात. वारंवार टक्कर झाल्यामुळे, प्लेट्सचे कोपरे वळवले जातात. जेव्हा जास्त दाब निर्माण होतो, प्लेट्स तुटतात आणि खाली असलेली ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते. मग या विघ्नानंतर भूकंप येतो.

केव्हा किती नुकसान होऊ शकते भुकंपाने?

रिक्टर स्केल

प्रभाव

0 ते 1.9

फक्त सिस्मोग्राफ द्वारे पाहिले जाऊ शकतात.

2 ते 2.9

सौम्य झटके

3 ते 3.9

जर एखादा ट्रक तुमच्या जवळून गेला तर असा परिणाम.

4 ते 4.9

खिडक्या तुटल्या असतील. भिंतींवर टांगलेल्या फ्रेम्स पडू शकतात.

5 ते 5.9

फर्निचर हलवू शकते.

6 ते 6.9

इमारतींच्या पायाला तडे जाऊ शकतात. वरच्या मजल्यांचे नुकसान होऊ शकते.

6 ते 6.9

इमारतींच्या पायाला तडे जाऊ शकतात. वरच्या मजल्यांचे नुकसान होऊ शकते.

7 ते 7.9

इमारती पडतात. जमिनीच्या आत पाईप्स फुटतात.

8 ते 8.9

इमारतींसह मोठे पूल देखील कोसळतात. त्सुनामीचा धोका आहे.

9 या पेक्षा जास्त

संपूर्ण विनाश. जर कोणी शेतात उभा असेल तर त्याला पृथ्वी फिरताना दिसेल. जर समुद्र जवळ असेल तर त्सुनामी येते.