मध्य प्रदेशात सिंधिया घराण्याआधी 'या' मराठा सरदाराने रोवले होते झेंडे, काय आहे नेमका इतिहास?

मध्य प्रदेशच्या राजकारणात सध्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नावाची चर्चा आहे. पण मध्य प्रदेशच्या मालवा परिसरात एकेकाळी मराठा सरदाराने मराठा साम्राज्याचे झेंडा पटकावला होता. 

Updated: Jun 27, 2024, 05:20 PM IST
मध्य प्रदेशात सिंधिया घराण्याआधी 'या' मराठा सरदाराने रोवले होते झेंडे, काय आहे नेमका इतिहास? title=

मध्यप्रदेशातील राजकारणात यावेळी सर्वात चर्चेत असलेलं नाव म्हणजे 'सिंधिया'. सिंधिया म्हणजे ज्योतिरादित्य सिंधिया. मराठा साम्राज्याचे शासक असलेल्या सिंधिया घराण्याने स्वातंत्र्यानंतर मध्य प्रदेशच्या राजकारणात सातत्याने हस्तक्षेप केला आहे. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात हे घराणे आपल्या प्रभाव पाडत आहेत. आणि प्रभावामुळे महत्त्वाची भूमिका बजावत आले आहे. पण योगायोग असा की, जेव्हा मध्य प्रदेशात सिंधिया घराण्याची स्थापना झाली, त्याच वेळी एका मराठा सरदाराने राज्याच्या माळवा भागात आपले नाणे खणकावले होते. त्यांचे नाव मल्हारराव होळकर. 

मल्हारराव हे सध्याच्या इंदौरचे राज्यकर्ते आणि मल्हारराव होळकरांना बाजीराव पेशव्यांनी शासक बनवले. पण मग होळकर घराणे मध्य प्रदेशमधून का गायब झाले? बाजीरावा यांनी माळव्याची सत्ता मल्हारराव होळकरांकडे का सोपवली? ग्वाल्हेरमध्ये सिंधिया घराण्याचा पाया देखील मल्हारराव होळकरांनी माळव्यावर राज्य करण्यास सुरुवात केली. 

सामान्य कुटुंबातील व्यक्ती ते राजापर्यंतचा प्रवास 

मल्हारराव होळकर हे वडिलोपार्जित कोणत्याही राजघराण्यातील किंवा थोर सेनापतीच्या घराण्यातील नव्हते. त्यांचा जन्म 16 मार्च 1693 रोजी पुण्यातील एका सामान्य कुटुंबात झाला. ते पेशवा बाजीरावांच्या सैन्यात काम करू लागले आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर लवकरच सरदार बनले. महाराष्ट्राबाहेर साम्राज्याचा झेंडा रोवणारे ते पहिले मराठा शासक होते.

निजामावर मराठ्यांच्या विजयात मल्हारराव होळकरांचा मोठा वाटा होता असे म्हणतात. यावर खूश होऊन बाजीरावाने त्यांना माळव्याचा सुभेदार बनवले. आणि येथूनच होळकर घराण्याचा पाया घातला गेला. 1736 मध्ये, दिल्लीवर मराठ्यांच्या महत्त्वपूर्ण विजयात त्यांचा प्रमुख सेनापती म्हणून सहभाग होता. यानंतर मुघलांविरुद्धचा लढा असो की निजामांविरुद्ध, मल्हारराव होळकरांनी मराठ्यांचा झेंडा रोवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. मल्हाररावांच्या राजवटीतच मराठा साम्राज्य शिखरावर पोहोचले होते. मराठा साम्राज्यात पेशवाई महत्त्वाची मानली तर बाजीराव पेशव्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्यांमध्ये मल्हाररावांचे नाव आघाडीवर होते.

ब्रिटिशांविरुद्धच्या युद्धात पराभव

मल्हार राव 1766 मध्ये मरण पावले आणि त्यांच्या मृत्यूपूर्वीच त्यांचा मुलगा आधीच मरण पावला होता म्हणून त्याचा नातू गादीवर आला. पण काही काळानंतर नातवाचाही मृत्यू झाला आणि मल्हाररावांची सून अहिल्याबाई होळकर हिने इंदौरची सत्ता हाती घेतली. यानंतर मराठे आणि इंग्रज यांच्यात वर्चस्व आणि सिंहासनासाठी युद्ध चालू राहिले. परंतु 1818 मध्ये झालेल्या तिसऱ्या मराठा-ब्रिटिश युद्धात इंग्रजांनी होळकर घराण्याच्या मोठ्या भागावर आपली सत्ता स्थापन केली. यानंतरही गादीवर काही वारसदार होते पण ते तितकेसे प्रभावी नव्हते.

मध्यप्रदेशात मराठ्यांच्या खुणा

सध्याच्या भारतीय राजकारणात अनेक राजघराण्यांचे वर्चस्व असल्याचे आपण पाहतो. मध्य प्रदेशच्या राजकारणात सिंधिया कुटुंबाचे वर्चस्व कोणापासून लपलेले नाही. स्वातंत्र्यानंतर राज्याचे राजकारण कुटुंबाभोवती फिरते. पण तिसऱ्या मराठा-ब्रिटिश युद्धाने होळकर घराण्याचे वर्चस्व संपुष्टात आले. मात्र, आजही माळवा भागातील लोक या राजघराण्याचा खूप आदर करतात. अनेक किल्ले आणि स्मारके मल्हाररावांच्या शौर्याची कथा सांगतात.