युती

राज ठाकरेंचे इंजिन सध्या भरकटलंय....

शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर शिवसेना-मनसे एकत्र येणार का, अशा चर्चा सुरू झाल्यात. मनसेकडूनच त्याला खतपाणी घातलं जातंय... मनसेवर ही वेळ का आली? आणि उद्धव ठाकरेंनी त्याला काय प्रतिसाद दिला? 

Jan 30, 2017, 08:25 PM IST

'छोटा भाऊ म्हणून युतीसाठी अजूनही तयार'

छोटा भाऊ म्हणून मनसे शिवसेनेसोबत युतीसाठी अजूनही तयार आहे, अजूनही वेळ गेलेली नाही

Jan 30, 2017, 06:42 PM IST

राज ठाकरेंची टाळी उद्धवनी फेटाळली

 मुंबई महापालिकेसाठी मनसेनं देऊ केलेली टाळी उद्धव ठाकरेंनी फेटाळली आहे.

Jan 30, 2017, 04:05 PM IST

पारदर्शक अजेंडा - एक बनाव

शिवसेना-भाजपमध्ये युतीवरून चर्चा सुरू झाली खरी पण भाजपने या चर्चेत शिवसेनेला कोंडीत पकडण्याची व्यूहरचना आखली असून शिवसेना या व्यूहरचनेत अडकल्याचे चित्र आहे. शिवसेनेबरोबर युती करण्याबाबत आपण सकारात्मक असल्याचे सांगत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती करण्याबाबतचे स्पष्ट संकेत दिले. मात्र हे संकेत देताना त्यांनी कधी नव्हे तो “पारदर्शक अजेंडा” हा शब्द समोर आणला. कुठल्याही पक्षांची युती अथवा आघाडीची चर्चा होते ती जागा वाटपावरून आणि असला मुद्दा तर तो किमान समान कार्यक्रमाचा असतो. या किमान समान कार्यक्रमामध्ये निवडणुकीला कोणते मुद्दे घेऊन सामोरं जायचं, जनतेला कोणती आश्वासने द्यायची अथवा सत्ता आल्यानंतर कोणती कामे करायची याचा प्रामुख्याने असला तर समावेश असतो. पण भाजपाने कधी नव्हे ते युती करताना पहिली अट टाकली आहे ती पारदर्शक अजेंड्याची. ही अट टाकूनच भाजपाने शिवसेनेची मोठी कोंडी केली आहे. प्रथमतः पारदर्शक अजेंडा म्हणजे काय याची फोड भाजपाने केलेली नाही. शिवसेनेनेही पारदर्शक अजेंडेचा वेगळा अर्थ काय असा सवाल उपस्थित केल्याने भाजपाने शिवसेनेसमोरही त्याची फोड केलेली दिसत नाही.

Jan 30, 2017, 11:19 AM IST

'जुनं नातं तुटल्यावर वेदना होतातच'

कुठलंही खूप जुनं नातं तुटलं की वेदना होतातच मात्र आता नवी पिढी आली आहे.

Jan 28, 2017, 06:03 PM IST

युती गोड बोलून तोडायला हवी होती- नितिन गडकरी

शिवसेनेला युती तोडायची होती तर ती गोड बोलून तोडायला हवी होती, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे 25 वर्षे युतीत शिवसेना सडल्याचा आरोप चुकीचा आहे. युतीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला होता. तसंच दोन्ही पक्षांकडून होत असलेले आरोप-प्रत्यारोपही योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Jan 28, 2017, 12:35 PM IST

शिवसेनेने गोड बोलून युती तोडायला हवी होती - नितीन गडकरी

शिवसेनेला युती तोडायची होती तर ती गोड बोलून तोडायला हवी होती, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलीय. त्याचप्रमाणे 25 वर्षे युतीत सेना सडल्याचा आरोप चुकीचा आहे. युतीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला होता. तसंच दोन्ही पक्षांकडून होत असलेले आरोप-प्रत्यारोपही योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Jan 28, 2017, 09:10 AM IST

युती तुटल्यावर पिंपरी चिंचवडमधील राजकारण कसे रंगणार...

शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर काय होणार अशी चर्चा सुरु असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पक्षला हवं तेच झाल्याचं चित्र आहे.

Jan 27, 2017, 09:30 PM IST