बाळासाहेब ठाकरे

प्रणव मुखर्जींमध्येच क्षमता आहे- बाळासाहेब

प्रणव मुखर्जी आणि पी. ए. संगमा यांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना केलेल्या शक्तीप्रदर्शनावर शिवसेनाप्रमुखांनी टीका केली आहे. याचबरोबर प्रणव मुखर्जींना दिलेला पाठिंबा म्हणजे यूपीएला दिलेला पाठिंबा नव्हे, असंही शिवसेनाप्रमुख म्हणाले.

Jun 30, 2012, 06:52 PM IST

प्रणवदा शिवसेनाप्रमुखांची भेट घेणार?

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी येत्या १३ तारखेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

Jun 30, 2012, 09:29 AM IST

बाळासाहेबांचा अनेकांनी फायदा घेतला- राज ठाकरे

सर्वात जास्त बाळासाहेब ठाकरे मला समजले, हे मला माहिती आहे. कोऱ्या कागदावर त्यांनी सह्या केल्या म्हणून इतकी वर्षे लागलीत सत्ता यायला. त्यांच्या सह्या घेतलेल्यांनी त्यांचा किती फायदा घेतला आहे. ते पण मला माहिती आहे. तो माणूस किती सरळ आहे, भोळा आहे, याची मला कल्पना असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे स्पष्ट केले.

Jun 20, 2012, 09:01 PM IST

काँग्रेस-सेना आतून सेटलमेंट- राज ठाकरे

काय आपल्याकडचे विरोधी पक्ष! काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देतात. याला विरोधीपक्ष म्हणतात? पाठिंबा देऊन वर सारवासारवीचे उत्तरं देतात. आम्ही काँग्रेसला पाठिंबा देत नाही, प्रणवदांना पाठिंबा देत आहोत. का ते बंगाली आहे म्हणून का? असा जोरदार हल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेनेवर चढविला आहे.

Jun 20, 2012, 08:48 PM IST

'शिवसेना अफझलच्या फाशीची मागणी करेल का?'

राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेनं प्रणव मुखर्जींना पाठिंबा दिल्यानं भाजप-सेनेत निर्माण झालेला तणाव कायम आहे. या निर्णयाचा फेरविचार करण्याच्या भाजपच्या मागणीला शिवसेनेकडून प्रतिसाद मिळाला नाही.

Jun 20, 2012, 08:42 PM IST

सेनेत नासका आंबा नाही, उद्धवचा राजला टोला

शिवसेनेत एकही नासका आंबा नाही, अशी भाषणाची सुरूवात करून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

Jun 20, 2012, 12:44 PM IST

शिवसेना @ 46

शिवसेनेच्या स्थापनेला आज ४६ वर्षं झाली. शिवसेनेला स्थापनेपासून संघर्ष करावा लागतोय. प्रत्येक राजकीय वादळात शिवसेना संपेल अशा वावड्या नेहमीच विरोधकांकडून उठवण्यात आल्या.. पण दरवेळी सर्व प्रश्नांना एकच उत्तर पुरेसे ठरते.. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

Jun 19, 2012, 11:36 PM IST

सेना-काँग्रेस 'मैत्रीत', भाजप सापडलं 'कात्रीत'?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं काँग्रेसला पाठिंबा दिल्यानं या दोन पक्षांतल्या मैत्रीचा आणखी एक अध्याय लिहिला गेला आहे.... पाच वर्षांपूर्वी एनडीएच्या उमेदवाराविरोधात जाऊन शिवसेनेनं काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटलांना पाठिंबा दिला होता.

Jun 19, 2012, 03:49 PM IST

संगमाना हवीय ठाकरेंची भेट

ए. पी. जे. अब्दुल कलमांच्या नावावर शिवसेना आग्रही आहे, तर ममता बँनर्जीही कलमांसाठी आग्रही आहेत.पी. ए. संगमाच्या उमेदवारीला शिवसेना विरोध करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पी. ए. संगमा यांनी शिवसेनाप्रमुखांकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. या भेटीसाठी संगमा मुंबईत येणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.

Jun 18, 2012, 12:20 PM IST

सेनाप्रमुखांच्या भेटीबद्दल गडकरींचा खुलासा

भाजप अध्यक्ष नितीन गडकरी मातोश्रीवर दाखल झाले. आणि वेगवेगळे तर्क-वितर्क आणि चर्चांना उधाण आलं. पण, आपण आपल्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी बाळासाहेबांची भेट घेतल्याचा खुलासा गडकरींनी केलाय.

May 27, 2012, 04:16 PM IST

मोदींना भाजप डावलू शकत नाही - ठाकरे

नरेंद्र मोदी यांना डावलून महत्त्वाचे निर्णय घेता येणार नाहीत, हेच मुंबईतील भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दिसून आले, असे सामनाच्या अग्रलेखाच्या सुरूवातीला म्हणून भाजपमधील अंतर्गत वादांवर, रुसव्याफुगव्यांवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही टिप्पणी केली आहे.

May 26, 2012, 09:58 PM IST

वणवा पेटवू - सेनाप्रमुखांची गर्जना

पेट्रोलच्या दरवाढीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. महागाईचा आगडोंब उसळूनही जनता काँग्रेसला निवडून देतेच कशी? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

May 24, 2012, 01:28 PM IST

ठाकरेंनी केले आमिरचे कौतुक, कर्नाटकावर तोंडसुख!

आमिर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमाच्या प्रसारणावर बंदी घालून कर्नाटक सरकारने काय मिळवले, असा सवाल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला आहे. निदान ‘सत्यमेव जयते’ या ब्रीदवाक्याचा तरी सन्मान ठेवायचा, पण प्रांतीयतेपुढे कसले आलेय सत्यमेव जयते!

May 8, 2012, 08:33 PM IST

अबू आझमींना २ वर्षं सक्तमजुरी

शिवसेनाप्रमुखांविरोधात भाषण करताना आझमी यांनी विधान केलं होतं की मुस्लिमांच्या रस्त्यात कुणी आडवं आल्यास त्यांना सोडणार नाही. पुन्हा देशाची फाळणी झाली तरी चालेल.

May 1, 2012, 09:20 AM IST

बाळासाहेब आणि राज ठाकरे गद्दार- काटजू

भूमिपुत्र ही थेअरीच मुळात देश विरोधी आहे. मोजके आदिवासी वगळता, भारतात कोणीच भूमिपुत्र नाही. म्हणून उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेणारे हे देखील मुळचे महाराष्ट्रातील नाहीत. त्यामुळे ठाकरेंनी महाराष्ट्र सोडून जावे.

Apr 27, 2012, 08:43 PM IST