बाबर आझमचं शतक, पण Virat Kohli ट्रोल, काय आहे कारण?

बाबरने शतक मारल्यानंतर तो खूप चर्चेत आला मात्र त्यानंतर सोशल मीडियावर विराट कोहलीला भरपूर प्रमाणात ट्रोल करण्यात आलं.

Updated: Mar 17, 2022, 09:13 AM IST
बाबर आझमचं शतक, पण Virat Kohli ट्रोल, काय आहे कारण? title=

मुंबई : पाकिस्तान क्रिकेट टीमचा कर्णधार बाबर आझम सध्या खूप चर्चत आहे. बाबरने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टेस्ट सामन्यात शतक झळकावत पुन्हा एकदा स्वतःला दाखवून दिलं आहे. या टेस्ट सामन्याच्या चौथ्या इंनिंगमध्ये बाबर आझमने 196 रन्सची उत्तम खेळी केली. बाबरने शतक मारल्यानंतर तो खूप चर्चेत आला मात्र त्यानंतर सोशल मीडियावर विराट कोहलीला भरपूर प्रमाणात ट्रोल करण्यात आलं.

बाबरने टेस्ट क्रिकेटमध्ये शतक झळकावलं, मात्र विराट कोहलीचे चाहते गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या शतकाची वाट पाहतायत. कोहलीने 2019 साली बांग्लादेशविरूद्ध शेवटचं शतक झळकावलं होतं. त्यानंतर त्याने 50 हून अधिक रन्स केले मात्र शतक त्याला करता आलं नाही. सध्या विराट खराब फॉर्ममध्ये आहे. यावेळी बंगळूरू टेस्टनंतर त्याच्या धावांची सरासरीही 50 पेक्षा खाली आली आहे.

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये कोहली पिछाडीवर

आयसीसीने बुधवारी टेस्ट रँकिंग जारी केलं आहे. यामध्ये विराट कोहली 9 व्या स्थानावर फेकला गेला आहे. तर यावेळी बाबर आझम विराटच्या पुढे आहे. बाबर विराटच्या एक स्थान पुढे म्हणजेच 8 व्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळलेल्या खेळीने बाबरचं रँकिंग सुधारण्यास मदत झाली आहे.