ही बदललेली टीम इंडिया आहे- विराट कोहली

ही बदललेली टीम इंडिया असून आम्ही जिंकायलाच आलो आहोत असा विश्वास टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने व्यक्त केला आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 31, 2017, 07:35 AM IST
 ही बदललेली टीम इंडिया आहे- विराट कोहली  title=

नवी दिल्ली : ही बदललेली टीम इंडिया असून आम्ही जिंकायलाच आलो आहोत असा विश्वास टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने व्यक्त केला आहे.

साऊथ आफ्रिका दौऱ्याआधी त्याने पत्रकारांशी नुकताच संवाद साधला. 

दौरा जिंकणार 

 २०१३ च्या फायनल पेक्षा आम्ही खूप बदलले आहोत. पण आम्ही कोणत्या भ्रमात नसल्याचेही कोहली याने यावेळी सांगितले. भारताने १९९२ पासून हा दौरा सुरू केल्यानंतर साऊथ आफ्रिकेत कोणती टेस्ट सिरीज जिंकली नाहीए.

दरम्यान सध्याच्या संघात असे १३ खेळाडू आहेत जे २०१३-१४ च्या फायनलमध्ये खेळली आहे. 

'आम्हाला माहितेय'

टीम म्हणून कशी वापसी करायची ? संधीचा फायदा कसा घ्यायचा ? हे आम्हाला चांगल ठाऊक असल्याचेही कोहलीने सांगतिले.

५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या मॅचमध्ये आम्हाला काय करायचय हे पक्क माहितेय असेही तो म्हणाला.