सचिनने सांगितल्या 'त्या' देवळाचा किस्सा...

बडोद्याविरुद्ध मुंबईची टीम गुरुवारी ऐतिहासिक ५०० वी मॅच खेळतेय. या मॅचपूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंबईच्या माजी क्रिकेटपटूंचा गौरव करणार आहे.  या कार्यक्रमात सचिन तेंडुलकर यांना आपल्या रणजी पदार्पण आणि काही रणजी सामन्यातील किश्शांनी उपस्थितांना खिळवून ठेवले. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 8, 2017, 11:02 PM IST
 सचिनने सांगितल्या 'त्या' देवळाचा किस्सा...  title=

मुंबई : बडोद्याविरुद्ध मुंबईची टीम गुरुवारी ऐतिहासिक ५०० वी मॅच खेळतेय. या मॅचपूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंबईच्या माजी क्रिकेटपटूंचा गौरव करणार आहे.  या कार्यक्रमात सचिन तेंडुलकर यांना आपल्या रणजी पदार्पण आणि काही रणजी सामन्यातील किश्शांनी उपस्थितांना खिळवून ठेवले. 

वयाच्या १४ व्या वर्षी त्याने रणजीसाठी माझी निवड झाली.  त्यावेळचा एक किस्सा सचिनने शेअर केला. हा सामना बडोद्याशी होता. त्यामुळे आम्ही ट्रेनने बडोद्याला गेलो. माझा रूम  पार्टनर सूरू नायर होता. त्याच्याकडे माझी जबाबदारी देण्यात आली. मी वेळेवर जेवतो का झोपतो का हे तो पाहायचा.  मग रात्रीचे साडे नऊ वाजले आणि सर्व माझ्या पेक्षा मोठे असलेले खेळाडू मला म्हटले. तू झोप आणि देवळात जाऊ येतो.  त्यावेळी मला त्यांच्या 'देवळा'ची व्याख्या माहिती नव्हती. पण मला अजून माहिती नाही त्या दिवशी देवळात काय झाले. 

त्यावेळी देवळात जाणे हे मला काही माहिती नव्हत. पण जसजसा मी मोठा झालो. तेव्हा देवळात जाण्याचा अर्थ कळू लागला. 

पाहा सचिन तेंडुलकरचा संपूर्ण व्हिडिओ... सचिनला तमिळही समजते.. ऐका किस्सा 

 

 

 

कधी सुरू होणार मॅच 

४१ वेळा रणजी जिंकणाऱ्या मुंबईच्या टीमचा रणजी क्रिकेटमध्ये दबदबा आहे. हा सामना उद्या ९ नोव्हेंबरपासून ते १२ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. या सामन्याला सकाळी ९.३० वाजता सुरु होणार आहे. सध्या रणजी चषक स्पर्धा सुरु आहे. 

मुंबई रणजीने दिग्गज प्लेअर दिले 

दरम्यान, पहिल्या असमान्य कामगिरीने या कॅप्टन्सनी मुंबईला स्थानिक क्रिकेटमध्ये वर्चस्व मिळवून दिलं. विजय मर्चंट, अजित वाडेकर, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि अजिंक्य रहाणेसारखे आतंराष्ट्रीय क्रिकेटपटू मुंबईनं भारतीय टीमला दिलेत. या आदींचा सामना करण्यात येणार आहे.

रणजीच्या इतिहासातील यशस्वी टीम 

रणजीच्या ८३ वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक यशस्वी टीम कुठली असेल तर ती म्हणजे मुंबईच. मुंबईची टीम बदलत गेली. नेतृत्व बदलले. मात्र, रणजी ट्रॉफी मुंबईकडे कशी राहिल हा एकमेव ध्यास या टीमध्ये येणाऱ्या प्रत्येक क्रिकेटपटूचा. त्यामुळेच खडूस मुंबईकर अशीच काहीशी या टीमची भारतीय क्रिकेटमध्ये ओळख. हा खडूसपणा मुंबईच्या प्रत्येक क्रिकेटपटूच्या नसानसात भिणलेला. कधीही हार न मानण्याच्या वृत्तीमुळे मुंबईच्या टीमचा रणजी क्रिकेटमध्ये कायमचं दबदबा पाहिला मिळतो.

मुंबईचा सोनेरी प्रवास 

१९३४ मध्ये रणजी क्रिकेटला सुरुवात झाली. आणि मग सुरु झाला भारतीय क्रिकेटमधील मुंबईच्या टीमचा सोनेरी प्रवास. मुंबईनं विक्रमी ४६ वेळा रणजी फायनलमध्ये प्रवेश केलाय. यात 41 वेळा रणजी ट्रॉफीवर नाव कोरण्यास त्यांना यश आलंय. १९५५-५६ ते १९७६-७७ मध्ये मुंबईचं सर्वाधिक वर्चस्व या टुर्नामेंटमध्ये दिसून आलं.

जाफरच्या सर्वाधिक धावा...

मुंबईनं याचदरम्यान २२ पैकी २० वेळा अजिंक्यपद पटकावलं. तर सलग १५ वेळा रणजी ट्रॉफी जिंकण्याची किमयाही केली. या टुर्नामेंटमधील सर्वाधिक रन्स या मुंबईकर वासिम जाफरच्या नावावरच आहे. १०१४३ रन्स त्याच्या नावावर आहेत. तर सर्वाधिक सेंच्युरीजही वासिम जाफरनचं केल्यात.