"मुलीसाठी इतके घाणेरडे..."; हसीन जहाँचे मोहम्मद शमीवर गंभीर आरोप

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांच्यातील वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे

Updated: Aug 14, 2022, 08:52 PM IST
"मुलीसाठी इतके घाणेरडे..."; हसीन जहाँचे मोहम्मद शमीवर गंभीर आरोप title=

Hasin Jahan on Mohammed Shami : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची (Mohammed Shami) पत्नी हसीन जहाँ (Hasin Jahan) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हसीन जहाँने यावेळीही मोहम्मद शमीवर गंभीर आरोप केले आहेत. मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांच्यातील वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. यावेळी त्याने आपल्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या मुलाखतीत मोहम्मद शमीबद्दल (Mohammed Shami) भाष्य केलं आहे.

मोहम्मद शमीसोबतच्या वादामुळे हसीन जहाँ अनेक दिवसांपासून आपल्या मुलीसोबत वेगळी राहत होती. हसीन जहाँ ही व्यवसायाने अभिनेत्री आहे. सध्या ती बंगाली भाषेतील चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना हसीन जहाँ म्हणाली की शमीला आपल्या मुलीला भेटण्यात रस नाही. आपल्या मुलीसोबत वाईट वर्तन केल्याचा आरोपही हसीन जहाँने केला आहे.

हसीन जहाँने मुलाखतीदरम्यान सांगितले की, "मी शमीशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला. मुलगी मोठी होत आहे. प्रत्येक ठिकाणी ती पाहते की सर्वांचे वडील त्यांच्या मुलांसोबत आहेत. इतकी वर्षे झाली, शमीने मुलीला गिफ्टही पाठवलेले नाही. मुलगी मोठी होत असून, तिने याबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. मागच्या वाढदिवसाला माझी मुलगी त्याची विचारपूस करत होती, म्हणून मी शमीला बोलायला सांगितले, गिफ्ट पाठवायला सांगितले. शमीने 100 रुपयांचे कपडे पाठवले. मला आश्चर्य वाटले की करोडो कमवणाऱ्याने आपल्या मुलीसाठी इतके घाणेरडे कपडे पाठवले."

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचा विवाह ७ एप्रिल २०१४ रोजी झाला होता. काही वर्षांनंतर तिने शमीवर बलात्कारासारखे गंभीर आरोपही केले आहेत. 2018 साली मोहम्मद शमीवर त्याची पत्नी हसीन जहाँने प्राणघातक हल्ला, बलात्कार, हत्येचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. हसीन जहाँने शमी आणि त्याच्या भावावर गुन्हा दाखल केला होता. या दोघांमध्ये बराच काळ वाद सुरू होता, मात्र अद्याप घटस्फोट झालेला नाही.

मात्र  शमीने हसीन जहाँने सर्व आरोप फेटाळले. मला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला असून अनेकदा मनात आत्महत्येचाही विचार आल्याचं शमीने म्हटलं होतं.