IPL 2019: मलिंगाचं जोरदार पुनरागमन, मुंबईला विजयासाठी हवे १७२ रन

बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मलिंगाने जोरदार पुनरागमन केलं आहे. 

Updated: Apr 15, 2019, 09:56 PM IST
IPL 2019: मलिंगाचं जोरदार पुनरागमन, मुंबईला विजयासाठी हवे १७२ रन title=

मुंबई : एबी डिव्हिलियर्स आणि मोईन अली यांच्या अर्धशतकाच्या जोरावर बंगळुरूने २० ओव्हरमध्ये १७१/७ एवढा स्कोअर केला आहे. लसिथ मलिंगाच्या शेवटच्या ओव्हरमुळे बंगळुरूला मोठा स्कोअर करता आला नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये मलिंगाने दोन विकेट घेतल्या तर एबी डिव्हिलियर्स रनआऊट झाला. अल्झारी जोसेफच्या दुखापतीमुळे मलिंगाने या मॅचमध्ये पुनरागमन केलं. मलिंगाचं हे पुनरागमन शानदार ठरलं. त्याने ४ ओव्हरमध्ये ३१ रन देऊन ४ विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्याला १ आणि जेसन बेहरनडॉर्फला १ विकेट मिळाली.

या मॅचमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. मुंबईच्या बॉलरनी रोहितचा हा निर्णय योग्य ठरवला. स्कोअरबोर्डवर १२ रन असतानाच बंगळुरूला विराटच्या रुपात पहिला धक्का लागला. तर पार्थिव पटेलही २८ रन करून आऊट झाला. यानंतर मोईन अली आणि एबी डिव्हिलियर्सने डाव सावरला. मोईन अलीने ३२ बॉलमध्ये ५० रनची खेळी केली. तर एबी डिव्हिलियर्सने ५१ बॉलमध्ये ७५ रन केले.

आत्तापर्यंत खेळलेल्या ७ मॅचपैकी ४ मॅचमध्ये मुंबईचा विजय तर ३ मॅचमध्ये पराभव झाला आहे. तर बंगळुरूनं आत्तापर्यंत खेळलेल्या ७ मॅचपैकी ६ सामने गमावले असून एका मॅचमध्ये त्यांचा विजय झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम चौथ्या क्रमांकावर आणि बंगळुरूची टीम शेवटच्या म्हणजेच आठव्या क्रमांकावर आहे.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा