वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडेत पावसाचा व्यत्यय

भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबवण्यात आलाय. 

Updated: Jun 23, 2017, 10:16 PM IST
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडेत पावसाचा व्यत्यय title=

पोर्ट ऑफ स्पेन : भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबवण्यात आला होता. 

खेळ थांबला तेव्हा भारताने ३९.२ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात १९९ धावा केल्या होत्या. धोनी नऊ धावांवर खेळतोय तर विराट कोहली ३२ धावांवर खेळत होता. 

सलामीवीर अजिंक्य रहाणेने ६२ धावा केल्या तर शिखर धवनने ८७ धावा केल्या. युवराज ४ धावांवर बाद झाला.