दुसरी टेस्ट जिंकण्यासाठी भारताला २८७ रन्सची आवश्यकता

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विजयासाठी भारताला २८७ रन्सची आवश्यकता आहे.

Updated: Jan 16, 2018, 07:45 PM IST
दुसरी टेस्ट जिंकण्यासाठी भारताला २८७ रन्सची आवश्यकता  title=

सेंच्युरिअन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विजयासाठी भारताला २८७ रन्सची आवश्यकता आहे. पहिल्या इनिंगमध्ये २८ रन्सची आघाडी मिळाल्यावर दुसऱ्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ २५८ रन्सवर ऑल आऊट झाला. भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या तर बुमराहला ३, इशांत शर्माला २ आणि आर.अश्विनला एक विकेट मिळाली. दक्षिण आफ्रिकेकडून एबी डिव्हिलियर्सनं सर्वाधिक ८० रन्स बनवल्या तर कॅप्टन फॅप डुप्लेसिसनं ४८ रन्स केल्या.

चौथ्या दिवसाची सुरुवात ९०/२ अशी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला पहिले तीनही धक्के मोहम्मद शमीनं दिले. शमीनं डीन एल्गारला ६१ रन्सवर, एबी डिव्हिलियर्सला ८० रन्सवर आणि क्विंटन डीकॉकला १२ रन्सवर ऑल आऊट केलं. त्यानंतर डुप्लेसीस आणि फिलँडरमध्ये पुन्हा एकदा पार्टनरशीप झाली. फिलँडरची विकेट काढून इशांत शर्मानं ही पार्टनरशीप तोडली. 

केप टाऊनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा पराभव झाला होता. त्यामुळे ३ टेस्ट मॅचच्या या सीरिजमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला ही मॅच जिंकावी लागणार आहे.